मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अलीकडेच झालेल्या खातेवाटपानंतर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेचे अब्दुल सत्तार यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अब्दुल सत्तार हे कॅबिनेट मंत्रिपदासाठी इच्छुक असताना त्यांना राज्यमंत्रीपद वाट्याला आल्याने ते नाराज आहेत. यामुळेच त्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिल्याचे सांगितले जात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार तर राज्यात स्थापन झाले आहे मात्र खातेवाटपाचे गुऱ्हाळ अजून सुरूच आहे.
तीन पक्षांनी मिळून स्थापन केलेल्या सरकारमध्ये निर्णय घेताना सर्वांना विश्वासात घेऊन काम करणे शिवसेनेला खूपच जड जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळेच कोणताही निर्णय घेताना महाविकासआघाडीला वेळ लागत आहे. खातेवाटपावरून महाआघाडी सरकारमध्ये बरेच दिवस चर्चा चालू असताना शिवसेना, कांग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये एकी दिसत नव्हती. त्यातच काँग्रेसला चार वाढीव खाती दिल्यानंतर त्याची यादी दिल्लीवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे येणं अपेक्षित आहे. राष्ट्रवादीची खातेवाटपाबाबत शुक्रवारी बैठक झाली असून पक्षाच्या वाट्याला आलेल्या खात्यांच्या वाटणीवर शिक्कामोर्तब करण्यात आला असल्याची माहिती मिळत आहे.
अशा प्रकारे असू शकत ठाकरे सरकारचं खातेवाटप
उद्धव ठाकरे (मुख्यमंत्री) : सामान्य प्रशासन,
अजित पवार (उपमुख्यमंत्री ) : अर्थ आणि नियोजन
बाळासाहेब थोरात- महसूल
अनिल देशमुख- गृहमंत्रालय
राजेंद्र शिंगणे – आरोग्य
एकनाथ शिंदे – नगरविकास आणि सार्वजनिक बांधकाम
सुभाष देसाई – उद्योग
यशोमती ठाकूर – महिला व बालकल्याण
उदय सामंत – परिवहन
अमित देशमुख- शालेय शिक्षण
जितेंद्र आव्हाड- गृहनिर्माण,
धनंजय मुंडे – सामाजिक न्याय
दिलीप वळसे-पाटील- उत्पादन शुल्क
आदित्य ठाकरे – पर्यावरण
अनिल परब – मुख्यमंत्री कार्यालय
नवाब मलिक – कामगार
जयंत पाटील- जलसंपदा
Visit : bahujannama.com