नंदुरबार : बहुजननामा ऑनलाईन – विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारवर कडाडून टीका केली आहे. विश्वासघाताने तयार झालेल्या सरकारने पहिला विश्वासघात हा अवकाळी पावसाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचा केला. दुसरा विश्वासघात कर्जमाफीतून त्यांना वगळून आणि आता १० रुपयात भोजन देणार असे सांगून त्यातही अटी लावल्या. महाराष्ट्राला मूर्ख बनविण्याचा हा नवा उद्योग आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली आहे.
नंदूरबार जिल्ह्यात आज धडगाव आणि बोरद येथे जिल्हा परिषद निवडणूक प्रचारासाठी दोन सभांना संबोधित केले. गरिब आणि आदिवासींसाठी आपल्या काळात केलेल्या कामांची माहिती दिली.#ZPelection pic.twitter.com/o1BTDix6bV
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) January 3, 2020
तसेच सात-बारा कोरा करण्याचे आश्वासन तर हवेतच गेले. आत १० रुपयात किती लोकांना भोजन देणार याचे जिल्हाशः आकडेच दिले जात आहेत, असेही फडणवीस म्हणाले. संपूर्ण नंदुरबार जिल्हा मिळून केवळ ३०० लोकांना हे जेवण मिळू शकेल, असा आरोपही त्यांनी केला. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी स्वातंत्र्यासाठी अनेक अत्याचार सहन केले.
दोनवेळा जन्मठेप भोगणारे ते एकमेव स्वातंत्र्यसेनानी आहते. ज्या कुटुंबाने राष्ट्रासाठी सर्वस्व अर्पण केले, त्यांचा अपमान शिवसेना किती वेळा सहन करणार, असा प्रश्नही फडणवीस यांनी नंदुरबार जिल्ह्यांतील सभेत बोलताना केला. काल काँग्रेसने एक पुस्तिका सादर केली. त्यात सावरकरांनी देशासाठी संपूर्ण जीवन दिले. त्यांच्याबद्दल अतिशय खालच्या दर्जाचे लिखाण त्या पुस्तिकेत केले आहे. ते समलैंगिक होते, अशा शब्दात लिखाण केले आहे. यावर आम्ही गप्प बसणार नाही. इतक्या खालच्या दर्जाचे लिखाण करत असाल, तर तुम्हाला तुमची जागा दाखवून देऊ, असा इशाराच जणू त्यांनी काँग्रेसला दिला.
Visit : bahujannama.com