नवी दिल्ली : वृत्तसंस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या विरुद्ध झारखंडची राजधानी रांचीच्या खालच्या कोर्टात हायकोर्टातील वकिलांनी फसवणूक आणि बनावटपणा केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. झारखंड हायकोर्टाचे वकील दोरंडा निवासी हरेंद्र कुमार सिंग यांनी दाखल केलेल्या खटल्याची सुनावणी गुरुवारी न्यायदंडाधिकारी अजय कुमार गुडिया यांच्या न्यायालयात झाली. या खटल्याच्या सुनावणीसाठी १ फेब्रुवारी ही तारीख दिली असून पुढील सुनावणीनंतर तक्रारदाराचे म्हणणे प्रतिज्ञापत्रात नोंदवले जाईल.
फिर्यादीने आपल्या तक्रारीत २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांनी परदेशातून काळा पैसा आणला जाईल, असे सांगितले होते. तसेच सर्व भारतीयांना १५ लाख रु. मिळतील आणि दरवर्षी तीन लाख सरकारी नोकऱ्या दिल्या जातील, या गोष्टीही भाजपच्या जाहीरनाम्यातमध्ये होत्या. ७ नोव्हेंबर २०१३ ला छत्तीसगढमध्ये नरेंद्र मोदींनी असे वचन देत लोकांना फसवून बहुमत मिळाले आहे. तसेच एका टीव्ही चॅनेलद्वारे अमित शहा यांनीही ५ फेब्रुवारी २०१५ रोजी काळा पैसे आल्यानंतर प्रत्येक भारतीयाला १५ लाख रु. मिळतील असे निवडणुकीच्या उद्दिष्ठाने म्हटले होते.
रामदास आठवले यांनीही १८ डिसेंबर २०१८ ला सांगलीमध्ये काळा पैसे आल्यावर प्रत्येक भारतीयाला १५ लाख रु. मिळतील, असे आश्वासन दिले होते. पण भाजप १५ लाख रुपये मिळण्याच्या गोष्टीवरून मागे हटत आहे. त्यांनी निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण केले नाही. १५ लाख रु. मिळतील असे सांगून लोकांना फसवले आहे. असे अनेक आरोप तक्रारदाराने केले आहे. हा गुन्हा कलम ४१५, ४२० आणि लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम १२३ नुसार दाखल केला आहे.
Visit : bahujannama.com