बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. मुंबईत पोलीस चौकशीसाठी आज त्यांच्या घरी पोहचले असता, त्यांनी पोलिसांशी दीड तास हुज्जत घातली. त्यामुळे अलिबाग पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर अर्णब यांना अटक करण्यात आली. या कारवाईवरुन भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ठाकरे सरकारला गंभीर इशारा दिला आहे. “अर्णब गोस्वामी यांना ज्या प्रकारे अटक करण्यात आली, ठाकरे सरकारला त्याची किंमत मोजावी लागेल,” असं सोमय्या (Kirit Somaiya)म्हणाले.
एक व्हिडिओ ट्विट करत सोमय्या म्हणाले, “अर्णब गोस्वामींच्या अटकेच्या आम्ही निषेध करतो. जेव्हापासून ठाकरे सरकार सत्तेत आले आहे. पत्रकारांना सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्ट यांना पोलीस बळाचा वापर करुन दाबण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. एखाद्या नौदल अधिकाऱ्याच्या घरात जाऊन त्यास मारहाण करणे, एखाद्या सोशल मीडिया अॅक्टिव्हिस्टचे मुंडन करणे व पत्रकारांना तुरुंगात टाकणे, ठाकरे सरकारला याचे उत्तर द्यावे लागेल. तद्वतच, मी अर्णब गोस्वामींना भेटण्यासाठी अलिबाग पोलीस स्टेशनला जाण्यासाठी मुंबईहून निघालो,” असल्याचे त्यांनी म्हटलं.
हम ठाकरे सरकार के पुलिस राज, पत्रकार और सोशल मीडिया एक्टिविस्ट्स के उत्पीड़न की कड़ी निंदा करते है, जो नेवी के अधिकारी की पिटाई करते है, पत्रकारोंको जेल में भेजते है #ArnabGoswami अर्नब गोस्वामीको जिस प्रकार से गिरफ्तार किया ठाकरे सरकार को इसकी कीमत चुकानी पड़ेगी @BJP4India pic.twitter.com/xMTEHDha7X
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) November 4, 2020
दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अटक केल्यानंतर गृहमंत्री अमित शहा, केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील या नेत्यांनी ठाकरे सरकारवर हल्लाबोल केला आहे. त्याशिवाय, भाजप कार्यकर्ते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या आवाहनानंतर आक्रमक झाले असून, ठिकठिकाणी आंदोलन करण्यात येत आहेत.