बहुजननामा ऑनलाइन टीम – रिपब्लिक टीव्हीचे (Republic TV) संपादक अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांना रायगड पोलिसांनी मुंबई येथील घरातून ताब्यात घेत अटकेची कारवाई केली आहे. 2018 साली इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी (Anvay Naik Suicide Case) अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. अटकेनंतर त्यांना अलिबाग पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. यावेळी पोलिसांना आपल्याला मारहाण केली असा आरोप अर्णब गोस्वामी यांनी केला आहे.
पोलिसांच्या गाडीत असतानाच अर्णब गोस्वामी यांनी हा आरोप केला आहे. एएनआय (ANI) सोबत बोलताना त्यांनी पोलिसांनी मारहाण केल्याचं सांगितलं आहे.
2018 साली इंटिरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी (Anvay Naik Suicide Case) अर्णब गोस्वामी यांना अटक करण्यात आली आहे. यासंदर्भात आता अन्वय नाईक यांच्या पत्नी अक्षता नाईक यांनी अर्णब यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीनं पैसे थकवल्यानंच आपल्या पतीनं आत्महत्या केली असं म्हटलं आहे.
अन्वय यांची पत्नी अक्षता नाईक म्हणाल्या, “अर्णब गोस्वामींनी सूडबुद्धीनं पैसे थकवल्यानंच माझ्या पतीनं आत्महत्या केली. अन्यथा माझा पती आता जिवंत असला असता. आम्ही एक नागरिक म्हणून पोलिसांवर विश्वास ठेवून एफआयआर (FIR) करतो आणि ती कचऱ्याच्या डब्यात का जाते” असा सवालही त्यांनी केला आहे. पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. यावेळी त्यांची मुलगीही त्यांच्यासोबत होती.