मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – Sanjay Raut Tweet | काँग्रेस नेते राहुल गांधींनी (Congress Leader Rahul Gandhi) स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्याबद्दल (Swatantryaveer Thackeray) वक्तव्यामुळे महाराष्ट्रात राजकीय वादळ उठले होते. राहुल गांधींच्या या विधानामुळे महाविकास आघाडीमध्ये (Mahavikas Aghadi) फूट पडू शकते, असे वक्तव्य उद्धव ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केले होते. त्यानंतर मात्र अचानक पलटी मारत संजय राऊत (Sanjay Raut Tweet) यांनी राहुल गांधीं यांच्या सोबत फोनवर झालेल्या चर्चेची माहिती ट्विट करुन दिली.
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
अनायसे फोन आलाच होता तर..
वंदनीय बाळासाहेबांच्या पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली का वाहिली नाहीत ??असं राहुलजींना विचारता आलं असतं…
ओलावा संपला आहे.. लाचारीत तो दिसतोय…सर्वज्ञानी जी @rautsanjay61 pic.twitter.com/F2jilGdGtm— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) November 21, 2022
संजय राऊत म्हणाले, भारत जोडोत व्यस्त असुनही राहुल यांनी रात्री फोन करुन माझ्या प्रकृतीची विचारपूस केली. आम्हाला तुमची चिंता होती. असे म्हणाले. राजकारणातील सहकाऱ्यास खोट्या प्रकरणात अडकवून तुरुंगात 110 दिवस यातना दिल्या याचे दू:ख वाटणे हीच माणुसकी आहे. हा ओलावा संपला आहे. यात्रेत तो दिसतोय..” नंतर त्या ट्विटला रिप्लाय देत नितेश राणेंनी (Nitesh Rane) शिवसेनेवर (Shivsena Uddhav Thackeray Group) पलटवार केला होता. आता भाजप महिला आघाडीच्या चित्रा वाघ यांनी देखील या वादात उडी घेतली आहे. (Sanjay Raut Tweet)
Join our Whatsapp Group, Telegram, and facebook page for every update
“अनायसे फोन आलाच होता तर. वंदनीय बाळासाहेबांच्या (Balasaheb Thackeray) पुण्यतिथीनिमित्त ट्विटरवरून श्रद्धांजली का वाहिली नाहीत ?? असं राहुलजींना विचारता आलं असतं…ओलावा संपला आहे.. लाचारीत तो दिसतोय…सर्वज्ञानी संजय राऊत, असे या चित्रा वाघ यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. उद्धव ठाकरेंकडून पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी अशा गांधी परिवारातील सर्वांना त्यांच्या स्मृतीदिनी श्रद्धांजली वाहिली गेली होती.
पण राहुल गांधींनी शिवसेना प्रमुखांच्या स्मृतिदिनी मात्र कोणत्याही प्रकारे श्रद्धांजली दिली नाही,
हे चित्रा वाघ यांनी अधोरेखित केले. असे असतानाही ओलावा संपलाय असे म्हणणे म्हणजे लाचारी आहे,
अशी टीका चित्रा वाघ यांनी संजय राऊतांवर केली.
Web Title :- Sanjay Raut Tweet | chitra wagh criticized sanjay raut who said he received a call from rahul gandhi
हे देखील वाचा :
Girish Mahajan | ‘खडसेंच्या मुलाची आत्महत्या की खून?’ तपासण्याची गरज, गिरीश महाजनांचे खळबळजनक विधान
Sanjay Raut | 50 रेडे गुवाहाटीला चालले म्हणणार्या संजय राऊतांना शिंदे गटाचे प्रत्युत्तर, म्हणाले…
Pune Crime | महिलेचा गळ्यावर वार करुन दगडाने ठेचून निर्घृण खून, चाकण परिसरातील घटना