पुणे : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणीत NDA ला घवघवीत यश मिळाले या मिळालेल्या मताधिक्क्यावर वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. मतमोजणीतील आकडेवारीत तफावत असल्याचा आरोप करत याविरोधात वंचित बहुजन आघाडीने आज (सोमवार) महाराष्ट्रभर ‘EVM हटावो, देश बचावो’ पुकारले आहे. त्या अंतर्गत पुणे शहराच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करून तीव्र निषेध करण्यात आला. देशभरात ‘EVM विरोधात संशयाचे वातावरण आहे.
यंदाच्या लोकसभेत महाराष्ट्रातल्या सर्व ४८ मतदारसंघात झालेले एकूण मतदान आणि प्रत्यक्ष मोजणी केलेले मतदान यामध्ये तफावत आढळून येते. त्यामुळे वंचित आघाडीचे नेते ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी राज्यातील ४८ मतदारसंघातील जिल्हाधिकारी आणि तहसील कार्यालयासमोर आज तीव्र स्वरूपाचे “घंटानाद आंदोलन” करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेकडो कार्यकर्त्त्यांसह महिला, युवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी “ईव्हीएम हटाव देश बचाओ” घोषणांनी परिसर दणाणून गेला होता.
पुणे शहरात भारीपचे पुणे शहराध्यक्ष व वंचित बहुजन आघाडीचे समनव्यक अतुल बहुले यांच्या नेतृत्त्वाखाली जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन देण्यात आले. या आंदोलनाला संभाजी ब्रिगेड, लष्कर ए भीमा, रिपब्लिकन परिवर्तन आघाडी यासह विविध संघटनांनी या आंदोलनास पाठींबा दिला. या आंदोलनात पुणे शहरातील आठही मतदारसंघातील युवक, महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्यने सहभागी झाले होते. तरी या लोकशाही विरोधी EVM मुळे मतदार व जनतेची फसवणूक झाली आहे याचा निषेध शहराध्यक्ष अतुल बहुले यांनी केला.
या आंदोलनात अतुल बहुले अध्यक्ष, जेष्ठ नेते वसंत साळवे, महिला अध्यक्ष शहरअनिता चव्हाण, महिला जिल्हाध्यक्ष सीमाताई भालसेन, विलास वनशिव, नवनीत अहिरे, अजित पानसरे, विकास चोरगे, प्रमोद कांबळे, विकास चोरगे, अजित वाघमारे, सचिन शिंदे, संदीप चौधरी, सोमनाथ सर्वगौड, गजेंद्र कांबळे आदी प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते.