मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा साखर कारखानदारांचे आगमन झाले असून मंत्रिमंडळात शपथ घेतलेल्या ३६ मंत्र्यांपैकी १६ मंत्र्यांचा संबंध साखर कारखान्याशी आहे. फडणवीस सरकारमधील मंत्र्यांपेक्षा ही संख्या चार पट अधिक आहे.
तर राष्ट्रवादीने उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटील यांच्यासह ८ साखर उद्योगपतींचा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. शिवसेनेकडून शपथ घेणारे शंभूराजे देसाई हे एकटेच साखर उद्योगपती आहेत. एका वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, काँग्रेसचे अशोक चव्हाण, अमित देशमुख, बाळासाहेब थोरात आणि दोन अपक्ष आमदार शंकरराव गडाख व राष्ट्रवादीचे बंडखोर राजेंद्र पाटील यांना मंत्रिपद मिळाले आहे.
महाराष्ट्रात अगोदरपासूनच साखर उद्योगपती हे काँग्रेस आणि राष्ट्रवादीशी संबंधित आहे. निवडणूक जिंकलेल्या साखर उद्योजकांना मंत्रिमंडळातील स्थान हे बक्षीस म्हणून देण्यात आले.
Visit : bahujannama.com