मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – सोमवारी मंत्रिमंडळात काँग्रेसच्या १० आमदारांच्या मंत्रिपदाच्या शपथविधीवेळी अस्लम शेख यांनी मंत्री आणि गोपनीयतेची शपथ घेतली. परंतु शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यावर अस्लम शेख यांच्या शपथविधीवरून टीका केली जात आहे. भाजपचे खासदार किरीट सोमय्या यांनी ट्विटरवर एक विडिओ शेअर करत “देशद्रोही आता देशभक्त झाले… उद्धवा, अजब तुझे सरकार” असे म्हणाले आहे.
यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. पण अस्लम शेख यांनी किरीट सोमय्या यांना दिल्लीतून उत्तर दिले आहे. त्यांनी काँग्रेसच्या सोनिया गांधींची भेट घेतल्यावर भाजप नेत्यांनाच देशद्रोही म्हटले आहे. अस्लम शेख यांनी २०१५ च्या अधिवेशनावेळी याकूब मेमनला दिलेल्या मृत्युदंडाची शिक्षा माफ करण्याची मागणी केली होती. तेव्हा भाजप व शिवसेनेच्या आमदारांनी सहा वेळा विधानसभेचे अधिवेशन थांबवत अस्लम शेखला देशद्रोही असल्याचे म्हटले होते.
पण आता तेच अस्लम शेख हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले आहेत, अशी टीकाही सोमय्या यांनी केली आहे. तसेच किरीट सोमय्या यांना उत्तर देत महात्मा गांधींना ठार मारणारेच देशद्रोही आहेत. मला मंत्रिपद मिळाले म्हणून त्यांच्या पोटात दुखत आहे. हे महात्मा गांधींना ठार मारणारे लोक आहेत. हेच नथुराम गोडसेंचे मंदिर उभारणारे भाजपावाले आहेत, असे अस्लम शेख यांनी म्हटले आहे.
Visit : bahujannama.com