मानसा (मित्तल) : वृत्तसंस्था – अकाली दल-भाजपा आघाडीत दिल्ली विधानसभा निवडणुकीमुळे निर्माण झालेल्या दुराव्यामुळे केंद्रीय कॅबिनेट मंत्री हरसिमरत कौर बादल मंत्रीपदाचा राजीनामा देऊन केंद्रीय मंत्रिमंडळातून बाहेर पडण्याची शक्यता आहे.
भाजपाने केले अकाली दलाकडे दुर्लक्ष
राष्ट्रीय नागरिकत्व दुरूस्ती कायद्याबाबत आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने भाजपाने अकाली दलाकडे दुर्लक्ष केले आहे, ज्यामुळे अकाली दलाला दिल्ली विधानसभा निवडणुकीतून बाहेर पडावे लागले आहे. दिल्ली निवडणुकीत भाजपाने अकाली दलास 6 जागा नाकारल्या आहेत.
शिअदसाठी मोठी परीक्षा
आता शिरोमणी अकाली दल (बादल) साठी ही मोठी परीक्षा आहे. आता भाजपा दिल्ली विधानसभा निवडणुकित शिरोमणी अकाली दलास दूर करून त्याचा राजकीय फायदा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. यातून हे स्पष्ट होते की, भाजपा पंजाबमध्ये आगामी विधानसभा निवडणुकीत स्वबळावर सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्नशील आहे.
रूढीवादी नेत्यांच्या विरोधाचा पक्षाला करावा लागत आहे सामाना
सध्या शिरोमणी अकाली दलास (बादल) अंतर्गत बंडखोरी करत असलेल्या रूढीवादी नेत्यांचा सामना करावा लागत आहे. हे नेते शिरोमणी अकाली दलास बादल कुटुंबापासून मुक्त करण्यावर ठाम आहेत. त्यांच्यासोबत पक्षातील नाराज रूढीवादी नेत्यांची संख्या वाढत आहे. जर भाजपासोबत त्यांनी हातमिळवणी केली तर पंजाबमध्ये राजकीय स्थिती स्फोकट होईल. सध्या शिरोमणी अकाली दलाचे बंडखोरी केलेले रूढीवादी नेते मागणी करत आहेत की, आता केंद्रीय कॅबिनेट मंत्री हरसिमरत कौर बादल यांनी केंद्रीय मंत्रीमंडळाचा राजीनामा द्यावा.
Visit : bahujannama.com