मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – लोकसभा निवडणुकीत काँग्रेस सारख्या दिग्गज पक्षाला दखल घ्यायला लावणारे वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे. काँग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपल्याचे सांगतानाच आगामी विधानसभा निवडणुकांसाठी चर्चा करायची असेल तर ती समसमान पातळीवर होईल, असे स्पष्ट केले आहे.
लोकसभा निवडणुकीपूर्वी कॉंग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यात जागा वाटपावरून एकमत न झाल्याने युती झाली नाही त्यामुळे वंचित बहुजन आघाडीने स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला त्याचा परिणाम लोकसभा निवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला आठ ते दहा जागांचा फटका बसला . तसेच काँग्रेसकडून वंचित बहुजन आघाडीवर सातत्याने आरोप होत आहेत कि ‘वंचित ‘भाजपाची बी टीम आहे. परंतु याला प्रकाश आंबेडकरांनी जोरदार उत्तर दिले आहे.
या संदर्भात प्रकाश आंबेडकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट केले असून यापुढेही काँग्रेसशी स्वत:च्या अटींवरच चर्चा करण्याचा इरादा त्यांनी व्यक्त केला आहे. काँग्रेसला यापुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल, असे त्यांनी स्पष्टपणे म्हटले आहे.
काँग्रेसला या पुढे वंचित बहुजन आघाडीसोबत चर्चा करायची असेल, तर ती समसमान पातळीवर येऊनच करावी लागेल. कारण कॉंग्रेससोबत राजकीय गुलामीची व्यवस्था संपली आहे.
— Prakash Ambedkar (@Prksh_Ambedkar) May 26, 2019