नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पक्षाने इतर लोकसभेच्या तुलनेत यंदा चांगलेच मताधिक्य मिळवले आहे. त्यामुळे तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चांगल्याच आक्रमक झाल्या आहेत. त्यांनी पक्षांतील दगाबाज नेत्यांचा शोध सुरू केला आहे.
लोकसभेच्या निकालानंतर ममता यांनी तृणमूल काँग्रेसच्या पक्षातील वरिष्ठांना आदेश दिले की, अशा नेत्यांना शोधून काढा ज्यांनी सीपीएमची आणि तृणमूलची काही मते भाजपला वळविण्यास मदत केली. टीएमसीच्या अंतर्गत सर्व्हेत समोर आले की, त्यांना जंगलमहल आणि उत्तर बंगालमधील गरीब लोकांची मते मिळाली नाही. या भागात आदिवासी मोठ्या प्रमाणात आहेत.
तृणमूलच्या एका नेत्याने सांगितले की, शहरी आणि निम्म शहरी भागातील आपला मतदार कायम ठेवण्यात तृणमूल ला यश आले. परंतु, सातवा वेतन आयोग राज्यात लागू करण्यात आला नसल्याने राज्यातील सरकारी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियांची जवळपास ७० लाख मते तृणमूलला मिळाली नसल्याचे त्यांनी सांगितले.