मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तिसरा पर्याय म्हणून उदयाला आलेल्या वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार औरंगाबाद मतदार संघातून विजयी झाला आहे. या निकालाची राजकीय वर्तुळात खूप चर्चाही झाली हा निकाल धक्कदायक होता अशाही चर्चा झाल्या. तसेच संबंध महाराष्ट्रात काँग्रेसला ‘वंचित’चा चांगलाच फटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेनच्या प्रवक्त्या नीलम गोऱ्हे यांनी यावर प्रतिक्रिया देतांना वंचित बहुजन आघाडीवर टीका केली आहे.
लोकसभा निवडणुकीतील औरंगाबादचा निकाल म्हणजे ‘गर्व से कहो हम निजाम है’ म्हणणाऱ्यांचा विजय आहे. वंचित आघाडीचा सर्वाधिक फायदा फक्त एमआयएमला झाला असल्याचे नीलम गोऱ्हे यांनी म्हंटले आहे. एका वृत्तसंस्थेशी त्या बोलत होत्या.
वंचित बहुजन आघाडीला लोकसभा निवडणुकीत एकाही जगावर विजय मिळवता आला नाही. तसेच वंचित चे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांचा सुद्धा पराभव झाला. एमआयएमचे इम्तियाज जलिल यांना वंचित आघाडीचे सांगण्यात येत असले तरी ते एमआयएम पक्षाकडून उमेदवार होते. त्यामुळे, त्यांना वंचित बहुजन आघाडीचे खासदार म्हणता येणार नाही. औरंगाबादमध्ये ‘गर्व से कहो हम निजाम है’ म्हणणाऱ्यांचा विजय झाला आहे. मराठवाड्यात रजाकारांच्या विरोधात मुक्तिसंग्रामात अनेक पिढ्या उतरल्या होत्या, या पिढ्यांना लोकशाहीच्या मार्गाने नेस्तनाभूत करण्याचा काम औरंगाबादच्या जनतेकडून घडवून आणले गेले आहे. अशी खोचक टीका नीलम गोऱ्हे यांनी केली.