सांगली : बहुजननामा ऑनलाइन – महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकेतील जवळपास सर्वच मतदार संघातील निकाल जाहीर झाले आहेत. जनतेने दिलेल्या कौलनुसार राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. अनेक नेते प्रचंड बहुमताने विजयी झाले आहेत. त्यात सांगलीतील काँग्रेसचे उमेदवार विश्वजित कदम यांनी राज्यात सर्वाधिक मतं घेण्याचा विक्रम केला आहे.
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसचे उमेदवार विश्वजीत कदम हे प्रचंड मताधिक्याने विजयी झाले आहेत. कदम यांनी १ लाख ६२ हजार ५२१ मते मिळवून विजय मिळविला आहे. महत्वाची बाब म्हणजे या मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मतं कुठल्याही उमेदवाराने मिळालेली नसून मतदारांनी नोटाला दुसऱ्या क्रमांकाची मतं दिली आहेत.
विश्वजीत कदम यांच्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दुसरा क्रमांक पटकावला आहे. अजित पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून सर्वाधिक मतान विजयी झाले आहेत. अजित पवार यांना १ लाख ६३ हजार १७६ मतं मिळाली असून त्यांनी भाजपचे उमदेवार गोपीचंद पडळकर यांचा पराभव केला. त्यामुळे अजित दादांच्या विरोधातील पडळकरांसहीत सर्व उमेदवारांचं डिपॉझिटही जप्त झालं आहे.
पलूस-कडेगाव विधानसभा मतदारसंघ
1. कदम विश्वजीत पतंगराव (काँग्रेस) – 171497 विजयी झालेले उमेदवार
2. राहुल शिवाजी पाटील (बहुजन समाज पार्टी) – 941
3.संजय अनंदा विभुते (शिवसेना) – 8976
4. अधीकराव संपत चन्ने (जनता पार्टी) – 323
5. अजिंक्यकुमार वसंत कदम (अपक्ष) – 715
6. अनील बाळा किणीकर (अपक्ष) – 188
7. संदीप रामचंद्र जाधव (अपक्ष) – 408
8. अॅड. प्रमोद गणपतराव पाटील (अपक्ष) – 2132
9. विलास शामराव कदम (अपक्ष) – 706
10. नोटा – 20631
टीप – मतदानाची आकडेवारी ही निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीवरून देण्यात आली आहे.