सांगली : बहुजननामा ऑनलाइन – जिल्हयातील पलूस तालुक्यातील ब्रह्रनाळ येथे कृष्णा नदीत पाण्याच्या प्रवाहामुळं खासगी बोट उलटली असून कृष्णा नदीत १५ जण बुडाले ९ जणांचा मृत्यू झाल्याची भिती असून १६ जण बेपत्ता झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळं संपुर्ण पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली आहे. बोटमध्ये एकूण ३० जण होते.
परग्रस्तांच्या मदतीसाठी गेलेली बोट उलटली आहे. एनडीआरएफचे जवानांनी बचावकार्य सुरू केले आहे. नेमके किती जण वाहून गेले आहेत याबाबतची माहिती सध्या प्रशासनाकडे देखील उपलब्ध नाही. बचावकार्य युध्दपातळीवर सुरू आहे. बोट उलटून ९ जणांचा मृत्यू झाल्याचे कळते आहे. बेपत्ता झालेल्या १६ जणांचा युध्दपातळीवर सुरू आहे.