धुळे : बहुजननामा ऑनलाइन – बालपणापासून स्वराज्य निर्मितीच्या काळापर्यंत जिजाऊ मॉँ साहेबच शिवरायांच्या गुरु होत्या, असे प्रतिपादन रायगड येथील शिवचरित्र व्याख्याते व विचारवंत प्रशांत देशमुख यांनी केले. शहरातील जयहिंद शैक्षणिक ट्रस्ट संचलित झेड. बी. पाटील महाविद्यालयात ‘राजमाता जिजाऊ‘ व्याख्यानमालेत ‘शिवरायांना स्वराज्याचे स्वप्न देणाऱ्या राजमाता जिजाऊ’ या विषयावर ते बोलत होते.
अध्यक्षस्थानस्थानी जयहिंद शैक्षणिक ट्रस्टचे चेअरमन डॉ.अरुण झुलालराव साळुंके यांनी भूषविले. याप्रसंगी व्यासपीठावर जयहिंद संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील,सचिव प्रदीप भदाणे, महाविद्यालय विकास समिती चेअरमन प्रा.सुधीर पाटील,जेष्ठ संचालक अजितरव मोरे, संचालक नानाभाऊ कोर अनिल चौधरी, शेखर सुर्यवंशी, संचालिका स्मिता साळुंके,प्राचार्य डॉ.पी.एच.पवार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. डॉ.ए.ए.पाटील, उपप्राचार्य डॉ.चुडामण पगारे, उपप्राचार्या डॉ.विद्या पाटील,अनिता पाटील आदी कार्यक्रमास उपस्थित होते.
श्री. देशमुख पुढे म्हणाले की, जिजाऊंनी केलेल्या संस्कारांमुळेच शिवाजी राजे घडले. युध्दाच्या नियोजनात जिजाऊच शिवबांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या होत्या. आदिलशाही,निजामशाही व कुतुबशाही यांच्या अन्याय व अत्याचाराने त्रस्त अशा समाजात आत्मविश्वास निर्माण करत अत्यंत कठीण परिस्थिती जिजाऊंनी शिवरायांचा राज्याभिषेक करुन स्रियांचा सन्मान असलेले न्याय व कायद्याचे स्वराज्य निर्माण केले.
वर्तमान परिस्थितीत युवकांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी जिजाऊ मॉ.साहेबांनी स्वराज्य निर्मितीसाठी दिलेले सर्वोच्च समर्पण व शिवरायांचे कर्तुत्व याचे चिंतन युवा मनावर होणे गरजेचे असल्याचे सांगितले. राष्ट्रासाठी शिवरायांसारखा न्यायप्रिय, स्रीयांचा आदर करणारा धैर्यवान,चारित्र्यवान,कर्तुत्ववान युवक घडविणे प्रत्येक मातेचे पवित्र कार्य आहे, असेही त्यांनी सांगीतले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ.अरुणराव साळुंके म्हणाले राष्ट्रमाता जिजाऊ मॉ साहेबांनी समाजात आपल्या प्रबळ इच्छाशक्तीच्या बळावर शिवबांना मार्गदर्शन केले. समाजाला स्वाराज्य प्राप्तीसाठी संघटीत केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ.पी.एच.पवार यांनी केले. भूमिका कथन संयोजिका डॉ.योगिता पाटील यांनी केले तर सुत्रसंचालन व उपस्थितांचे आभार प्रा.भाग्यश्री पाटील यांनी मानलेत. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्याख्यानमाला संयोजन समिती सदस्य प्रा.पी.एस.गिरासे, प्रा.विजयकुमार जवराळ, प्रा.कल्पना देवरे, प्रा.जितेंद्र पाटील,प्रा.समीर शहा,प्रा.संगीता जगदाळे,प्रा.पूनम माळीच, प्रा.रविंद्र पावरा, प्रा.रोहित वाडिले, प्रा.राजेश मावची,दगा बोरसे यांनी परिश्रम घेतले.