बहुजननामा ऑनलाइन टीम – बॉलिवूडची हुशार आणि सुंदर अभिनेत्री तब्बू (Tabu)आज आपला वाढदिवस साजरा करीत आहे. तब्बू आज 50 वर्षांची झाली आहे आणि ती आतापर्यंत इंडस्ट्रीमध्ये एकापेक्षा एक चित्रपट देत आहे. चित्रपटांव्यतिरिक्त तब्बूच्या वैयक्तिक जीवनाबद्दलही जबरदस्त चर्चा आहे. प्रत्येकाला आश्चर्य वाटत आहे, की आजही इंडस्ट्रीची ही सुंदर अभिनेत्री सिंगल का आहे. तब्बूने स्वतः खूप आधी सिंगल स्टेटसचे रहस्य सांगितले होते. या दरम्यान तिने आपल्या सिंगल असल्याचे अभिनेता अजय देवगनला जबाबदार मानले होते.
तब्बूने बर्याच दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते, कीअजय देवगन तिचा चांगला मित्र आहे. यासह, तिने अजय देवगणमुळे सिंगल असल्याचे कारण देखील सांगितले. ती म्हणाली होती की, ‘अजय आणि मी 25 वर्षांपासून एकमेकांना ओळखत होतो, अजय माझ्या चुलतभावाचा समीर आर्य यांचा जवळचा मित्र होता. त्यावेळी आम्ही एकत्र वाढत होतो आणि तेव्हापासूनच आमची मैत्री होती.
तिने सांगितले, की ‘मी लहान असताना समीर आणि अजय माझ्यावर नजर ठेवत असत, माझा पाठलाग करत असत आणि जर कोणत्या मुलाने माझ्याशी बोलायचा प्रयत्न केला तर दोघेही त्याला मारहाण करण्याची धमकी देत असत. आज मी सिंगल आहे त्याचे कारण अजय देवगन आहे.’ त्याचवेळी तिला असेही विचारले गेले, की लग्न करून देण्याची जबाबदारी अजय देवगनने घेतली नाही का? मग तब्बू हसून म्हणाली, की ‘मी अजयला दररोज कॉल करुन सांगते, की लग्नासाठी मला मुलगा शोध’. तब्बूने असेही म्हटले आहे, की पुरुष कलाकारांमध्ये तिचा सगळ्यात जास्त विश्वास अजयवर आहे.
या दोघांचे चित्रपट म्हणजे ‘विजयपथ’, ‘हकीकत’, ‘तक्षक’, ‘दृश्यम’, ‘गोलमाल अगेन’, ‘दे दना दन’ सुपरहिट राहिला आहे. बर्याच लोकांनी अजय देवगनचे नाव तब्बूशीही जोडले, पण या सर्व अफवा खोट्या ठरल्या आणि अजयने काजोलशी लग्न केले.