नवी दिल्ली : वृत्तसंस्था – मोदी सरकारने शेतक-यांसाठी नवी निवृत्ती पेन्शन योजना आणली आहे. या योजनेनुसार शेतक-यांना वयाची साठीनंतर प्रतिमहिना ३ हजार रुपये निवृत्तीवेतन पेन्शन म्हणून मिळणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी ही माहिती दिली.
तोमर म्हणाले, शेतक-यांकडे उतारवयात पैसा नसतो. त्यामुळे त्यांना रोजच्या गरजा भागविणेही अवघड होऊन बसते. याचा विचार करून सामाजिक हेतूने सरकारने ही योजना काही अटींसह लागू केली आहे. विशेष म्हणजे देशातील सर्व लहान आणि मध्यम गटातील शेतकNयांसाठी ही पेन्शन योजना लागू करण्याला आली आहे.
वयाची ६० वर्षे पूर्ण केल्यानंतर शेतकयांना ही पेन्शन मिळेल. या योजनेद्वारे पात्र शेतकNयांना प्रतिमहिना ३००० रुपये पेन्शन दिली जाईल. या योजनेसाठी शेतकNयांना वयाच्या १८ ते ४० या वयात नोंदणी करावी लागणार आहे. एलआयसीकडून ही योजना राबवण्यात येणार आहे. शेतक-यांना एलआयसीकडे नोंदणी करावी लागणार आहे.
योजनेत सहभागी झालेल्या शेतक-यांना प्रतिमहिना १०० रुपये पेन्शन फंडात भरावे लागणार आहेत. वयनुसार त्यात बदल होतो आहे. शेतकरी जेवढी रक्कम पेन्शन योजनेत गुंतवतील, तेवढीच रक्कम सरकारकडूनही गुंतविली जाईल.
“संधिवात” बरा करायचा असेल तर पाळा हे पथ्य
पावसाळ्यात आजारांपासून दूर राहायचे असेल तर ‘फळे’ खाण्यापूर्वी हे करा