नवी दिल्ली : बहुजननामा ऑनलाईन – नुकत्याच जाहीर झालेल्या राष्ट्रीय नमुना सर्वेक्षण कार्यालयाच्या नवीन अहवालानुसार धक्कादायक माहिती समोर आली आहे. २०१७- २०१८ च्या अहवालानुसार १५ ते ५९ वर्षांच्या मधील ग्रामीण महिलांमध्ये नोकरी गमावण्याचं प्रमाण अधिक आहे. ग्रामीण भागातील महिलांची भागीदारी २००४ -०५ मध्ये ४९.५ टक्क्यांहून कमी होऊन २०११ – १२ मध्ये ३५. ८ टक्के आहे. २०१७-१८ मध्ये ती संख्या घटून २४.६ टक्क्यांवर आली आहे.२००४- ०५ मध्ये महिलांचं काम करण्याचं वय कमी झालेलं आहे. असे या नवीन अहवालावरून पाहायला मिळते.
२०११-१२ आणि २०१७-१८ मध्ये ग्रामीण भारतात जवळपास ३.२ कोटी मजुरांनी नोकऱ्या गमावल्या आहेत. जे गेल्या सर्वेक्षणामध्ये २९.२ टक्के होती. या नोकरी गमावणाऱ्या लोकांमध्ये जवळ -जवळ ३ कोटी शेतकरी आहेत. एनएसएसओ द्वारा जाहीर केलेल्या पीरियोडिक लेबर फोर्स सर्व्हे (पीएलएफएस)२०१७-१८ ची एक रिपोर्टनुसार२०११-१२ मध्ये शेती करणाऱ्यांमध्येही ४० टक्के घट नोंदवली गेली आहे. हा डाटा नाव न जाहीर करण्याच्या अटीवर अधिकाऱ्यांनी दिला आहे.