मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणावर न्यायालयाने शिक्कामोर्तब केले आहे. सर्वांना शुभेच्छा. आरक्षणाच्या लढ्यात ५० पेक्षा जास्त तरुणांचं बलिदान झालं आहे. हे आरक्षण त्यांना खरी श्रद्धांजली असेल. अशा शब्दात छत्रपती उदयनराजे भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
मराठा समाजाला राज्य सरकारकडून मराठा आरक्षण कायदा अस्तित्वात आला. त्यानंतर याविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने मराठा आरक्षण वैध ठरवत ते १६ टक्क्यांऐवजी १२ ते १३ टक्क्यांवर असावं असं स्पष्ट केलं.
मराठा आरक्षणावर शिक्कामोर्तब; सर्वांना आरक्षणाच्या शुभेच्छा. आरक्षणाच्या लढ्यात 50 पेक्षा जास्त तरुणांचं बलिदान झालं हे आरक्षण त्यांना खरी श्रद्धांजली असेल.
माननीय उच्च न्यायालयाने मराठा समाजाची बाजू ऐकून त्यांना न्याय दिला त्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक आभार. pic.twitter.com/2bSLCFIvry
— Chhatrapati Udayanraje Bhonsle (@Chh_Udayanraje) June 27, 2019
यावर उदयनराजेंनी शुभेच्छा देणारं ट्विट केलं आहे. लढ्यात बलिदान झालेल्या तरुणांना ही श्रद्धांजली असेल असे ते म्हणाले. त्यानंतर मराठा समाजाला प्रदिर्घ संघर्षानंतर हे आरक्षण मिळालं आहे. या आरक्षणाचा आनंद झाला आहे. मराठा आरक्षण टिकणं हे किती महत्त्वाचं होतं. किती टक्के हा दुसरा मुद्दा आहे. कोर्टाच्या निर्णयाचं स्वागत केलं पाहिजे. असे ते म्हणाले.
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैध ठरविल्यानंतर मराठा समाजाने आनंद व्यक्त केला आहे. मराठा समजाने मागील पाच वर्षात राज्यभरात शांततेत मोर्चे काढले. त्यानंतर त्यात तरुणांचे बळी गेले. राज्य सरकारने आणलेल्या आरक्षणाला आता वैध ठरविण्यात आले. त्यामुळे राज्य सरकारलाही मोठा दिलासा मिळाला आहे.