सातारा : बहुजननामा ऑनलाईन –लोकसभा निवडणूकीनंतर ईव्हिएम मशीनविरोधात खासदार उदयनराजेंनी घेतलेल्या भुमीकेचे वंचित बहुजन आघाडीने स्वागत केले आहे. उदयनराजेंनी ईव्हिएमविरोधासाठी खासदारकीचा राजीनामा देऊ नये. तर हा विषय सभागृहात लावून धरावा अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे सातारा जिल्हा समन्वयक खंडाईत यांनी केली.
उदयनराजे लोकशाही हितासाठी वंचितांची भुमीका उचलून धरत असतील तर त्यांना मनापासून धन्यवाद देणे आमचे नैतिक कर्तव्य आहे. प्रकाश आंबेडकर यांनी निवडणूक आयोगाकडे ईव्हीएम नको बॅलेट पेपर हवा या मागणीसाठी रेटा लावला आहे. या स्थितीत महाराष्ट्रात कोणताही पक्ष किंवा नेता आक्रमक झालेला दिसत नाही.
यावेळी उदयनराजेंनी ईव्हिएमविरोधात भूमिका घेऊन अप्रत्यक्ष वंचितांच्या लढाईत सहभाग दर्शवला आहे. ही बाब स्वागतार्ह आहे. असे खंडाईत म्हणाले. त्यांनी हा मुद्दा सभागृहात लावून धरावा, जोपर्यंत ईव्हिएम हटावचा निर्णय होत नाही. तोपर्यंत सभागृहाबाहेर पडणार नाही असा पवित्रा त्यांनी घ्यावा. असेही खंडाईत म्हणाले.