मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मराठा आरक्षणाला न्यायालयाने शिक्षण आणि नोकरीत वैध ठरवले आहे. मराठा समाजाला आरक्षण देणाऱ्या कायद्याला वैध ठरविणाऱ्या निर्णयाचे रिपब्लीकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीस सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनी स्वागत केले आहे.
राज्यात मराठा समाजाच्या आरक्षणाला उच्च न्यायालयाने वैध ठरविल्यानंतर मराठा समाजाने आनंद व्यक्त केला आहे. मराठा समजाने मागील पाच वर्षात राज्यभरात शांततेत मोर्चे काढले. त्यानंतर त्यात तरुणांचे बळी गेले. न्यायालयाने राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यासोबतच राज्यात मराठा समाजाचे आरक्षण सुरुच राहिल परंतु ते १६ टक्के ऐवजी १२ ते १३ टक्के असायला पाहिजे. ते राज्य सरकार बदलू शकते किंवा तसेच ठेवू शकते असं न्यालायाने स्पष्ट केले.
मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमीका रामदास आठवले यांनी घेतली होती. त्यानंतर आता न्यायालयाने दिलेल्या या निर्णयाचे आठवले यांनी स्वागत केले आहे.