मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे नेते आणि राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी आता आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या संदर्भात एक मोठं विधान केलं आहे. तर ठाकरे सरकार महाराष्ट्रात येत आहे, त्यांच्या सोबत जाऊ नये. तुमच्या फाईल तयार आहेत. यड्रावकरांपासून अनेक आमदारांना शुक्ला यांनी धमक्या दिल्या होत्या. हे सगळ्यांना माहित होते. भाजपा सरकारसोबत जा, अशा प्रमाणाचे इशारे पोलीस खात्याकडून दिले जात होते. शुक्लांना राज्य सरकारने तरीपण ६ महिने पदावर ठेवले होते याचं मला आश्चर्य वाटते, असे राऊत यांनी म्हटले आहे.
याबाबत बोलताना संजय राऊत म्हणाले, महाराष्ट्राचे मुख्य सचिव सीताराम कुंटें यांनी काल एक अहवाल (Report) दिला आहे. त्यात फोन टॅपिंगबाबत (Phone tapping) मोठे खुलासे आहेत. भाजपाला फायदा होईल, राजकीय फायद्यासाठी हे अधिकारी आमदारांचेच नाही तर खासदार आणि पत्रकारांचेही फोन टॅप करत होते. पत्रकारांना काय माहिती आहे हे त्यांना हवे होते. शरद पवारांचे फोन टॅप केले गेले, ही अत्यंत गंभीर गोष्ट आहे, तसेच सरकार जे बसले आहे. त्यांना या गोष्टीचे गांभीर्य समजायला हवे. अधिकाऱ्यांच्या खांद्यावर मान ठेवून राज्य करता येत नाही. तर पुढे ते म्हणाले, API पासून ते पोलीस अधिऱ्यापर्यंत कशी बगलेत दबली जाते आहे ते पाहिलं आहे. आता सरकारने यातून बोध घ्यावा, असा इशारा देखील संजय राऊत यांनी दिला आहे.
पुढे राऊत म्हणाले, पोलिस खात्यातील असे ४-५ अधिकारी आमच्या, शरद पवारांच्या नजरेत आले होते. त्यांच्यावर विश्वास कसा ठेवला असा प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे. बाळासाहेबांनीदेखील अधिकाऱ्यांच्या मदतीने सरकार चालविता येत नाही, असे सांगितले होते. युतीसरकारच्या काळातही माजी मुख्यमंत्री मनोहर जोशींना बाळासाहेबांनी २ अधिकाऱ्यांना सुट्टीवर जाण्यास सांगितले होते, असेही ते म्हणाले. तर वेळीच या अधिकाऱ्यांना बाजुला केले असते तर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस ज्या फाईल घेऊन दिल्लीला गेले होते, ते झाले नसते, असेही राऊत म्हणाले.
राऊतांचा ममतांच्या प्रचाराला जाण्य़ाचा विचार –
राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार हे पश्चिम बंगालला जाणार आहेत. माझा विचार आहे जाण्याचा. काँग्रेसने आक्षेप घेतलेला, मात्र, पवार हे देशाच्या फायद्याचा त्यांच्या विवेकबुद्धीला पटणारा निर्णय घेतात. यामुळे भाजपाची प्रचार करण्याची पद्धत पाहता ममतांचे हात बळकट करणे गरजेचे आहे, असे संजय राऊत यांनी सांगिलते.