नवी दिल्ली : वृत्त संस्था – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी ब्रू-रियांग शरणार्थींचे त्रिपुरामध्ये कायमस्वरूपी पूनर्वसन करण्याच्या कराराचे स्वागत करताना म्हटले की, यामुळे त्यांना मोठी मदत मिळेल. ब्रू-रियांग शरणार्थींना सरकारच्या अनेक कल्याणकारी योजनांचा लाभ मिळणार आहे. गुरूवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि त्रिपुराच्या ब्रू शरणार्थींच्या प्रतिनिधींनी एका करारावर हस्ताक्षर केले. या करारासोबतच ब्रू शरणार्थींच्या समस्येवर तोडगा निघाला आहे.
शहा यांनी सांगितले की, त्रिपुरामध्ये सुमारे 30,000 ब्रू शरणार्थींचे पूनर्वसन क्ररण्यात येईल. यासाठी 600 कोटी रूपयांच्या पॅकेजची घोषणा करण्यात आली आहे. ब्रू शरणार्थींसाठी मोदी यांनी ट्विट केले आहे की, हा दिवस खुप खास आहे. सरकार पूर्वोत्तर आणि तेथील लोकांच्या विकासाठी वचनबद्ध आहे. या करारामुळे ब्रू-रियांग शरणार्थींना मदत मिळेल. त्यांना असंख्य विकास योजनांचा लाभ मिळणार आहे. हे विस्थापित ब्रू आदिवासी 1997पासून त्रिपुराच्या वेगवेगळ्या भागात शरणार्थी म्हणून रहात होते.
कोण आहेत ब्रू शरणार्थी
ब्रू शरणार्थी हे बाहेरच्या देशाचे नव्हे तर आपल्याच देशाचे नागरिक आहेत. ज्यांना ब्रू (रियांग) जमाती म्हटले जाते. मिझोराममध्ये मिझो जमातीने आपला हक्क प्रस्थापित करण्यासाठी मिझो उग्रवाद्यांनी अनेक जमातींना लक्ष्य केले, ज्यांना ते बाहेरचे समजत होते. 1995मध्ये यंग मिझो असोसिएशन आणि मिझो स्टूडेन्ट्स असोसिएशनने ब्रू जमातीला बाहेरचे म्हणजेच उपरे घोषित केले. ऑक्टोबर 1997 मध्ये ब्रू लोकांच्या विरोधात मोठी हिंसा झाली. ज्यामध्ये डझनभर गावातील शेकडो घरे जाळण्यात आली. ब्रू जमातीने मिझोराममधून येऊन त्रिपुरामध्ये आसरा घेतला आणि त्यांना कंचनपुर, उत्तर त्रिपुरामध्ये तात्पुरत्या कॅम्पमध्ये ठेवण्यात आले होते. तेव्हापासून हे लोक जीव वाचविण्यासाठी रिलीफ कॅम्पमध्ये रहात होते.
Visit : Bahujannama facebook page –
- ‘अॅपल टी’चे हे 4 फायेद वाचून व्हाल थक्क! जाणून घ्या ‘रेसिपी’
- संधिवाताची ‘ही’ आहेत 10 लक्षणे आणि 11 कारणे, जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
- रंग आणि आरोग्याचे ‘कनेक्शन’ ! जाणून घ्या ‘या’ 10 रंगांचे तुमच्यावरील परिणाम
- ‘या’ 6 पद्धतीने करा तुमच्या आयुष्यातून तणावाला हद्दपार
- ‘विराट’ आणि ‘सेरेना’नेही केला होता फॉलो, ‘वेगन डाएट’चे हे 6 फायदे जाणून घ्या