बहुजननामा ऑनलाइन टीम – बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या नेतृत्वाखालील एनडीएने अटीतटीची लढाई लढत सत्ता (Opposition )आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले आहे. तेव्हाच बिहार विधानसभा निवडणुकीत ५० जागा लढवणाऱ्या शिवसेनेच्या उमेदवारांना नोटा पेक्षाही कमी मते मिळाली आहेत. त्यावरुन(Opposition ) आता भाजपाचे नेते निलेश राणे यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे.
निलेश राणे यांनी ट्विट करत म्हटलं की, “संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहेत तोपर्यंत विरोधकांना भीती नाही. कारण या निवडणुकीत शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच अस्वस्था महाराष्ट्रात संजय राऊत करतील अशी आम्हाला खात्री आहे,” असे म्हणत त्यांनी राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
संज्या आज संध्याकाळपासून कंपाऊंडर जवळ बसला असेल. संजय राऊत जोपर्यंत शिवसेनेत आहे तोपर्यंत विरोधकांना भीती नाही कारण या निवडणुकीमध्ये शिवसेनेची बिहारमध्ये जी अवस्था केली तशीच शिवसेनेची अवस्था महाराष्ट्रात संज्या राऊत करेल ही आम्हाला खात्री आहे. https://t.co/8H2cZK6yJ7
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) November 10, 2020
संजय राऊतांनी नगरपरिषदेमध्ये निवडून यावे, मग बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर बोलावे
“बिहारच्या मुख्यमंत्रीपदावर शिवसेनेला बोलायचा अधिकार काय ? बिहारमध्ये ज्यांचे डिपॉझिट जप्त झाले, ते मुख्यमंत्रीपदावरुन बोलणार. संजय राऊत यांना या विषयावर बोलण्याचा काय अधिकार? त्यांनी कधी निवडणूक लढवली नाही. संजय राऊत यांची किंमत काय आहे समाजामध्ये. राऊत एकदा तरी समाजातून निवडून आले आहेत का? संजय राऊत यांनी एका नगरपरिषदेच्या निवडणुकीत निवडून येऊन दाखवू देत. राऊत आणि निवडणूक यांचा काही संबंध नाही,” असा हल्लाबोल निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर वार्ताहरांशी बोलताना केला.