मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – महिन्याभराच्या सत्तासंघर्षणानंतर अखेर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. भाजपसोबत युती तुटल्यानंतर शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे सत्ता स्थापनेसाठी पाठिंब्याची मागणी केली होती. त्यावेळी बैठकांवर बैठक घेत काँग्रेसने पाठिंब्याला उशीर केला होता. ज्यामुळे अजित पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत जावून सरकार स्थापन केले. मात्र आता सरकार स्थापन आल्यावरही मंत्रीपदांचे वाटप करण्यातही काँग्रेसकडून संथगतीने काम सुरु असल्याचे बोलले जात आहे.
भाजपसोबत २५ वर्षाची युती तुटल्याने शिवसेनेने राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत आपला नवीन संसार थाटण्यासाठी प्रयत्न सुरु केले.त्यावेळी राष्ट्रवादीची साथ मिळाली, मात्र बहुमतासाठी काँग्रेसचा पाठिंबा आवश्यक होता. मात्र काँग्रेसकडून वेळेत प्रतिसाद मिळत नसल्याचा दावा अनेक नेत्यांनी केला होता.
दरम्यान, अखेर राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले असून उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावेळी तीनही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. नव्या सरकारमध्ये शिवसेनेला १५, राष्ट्रवादी काँग्रेसला १६ आणि काँग्रेसला १३ मंत्रीपदं देण्याचं ठरल आहे. तर उर्वरित मंत्रीमंडळाचा विस्तार अद्याप होऊ शकला नाही. त्यामुळे मंत्रीमंडळात कुणाला स्थान द्यायचे हे अजून स्पष्ट झालेले नाही. राष्ट्रवादीची यादी अंतिम टप्प्यात तर दुसरीकडे मात्र काँग्रेसकडून अद्याप मंत्रीपदासंदर्भातील निर्णय अंतिम झाला नाही.
Visit : bahujannama.com