बहुजननामा ऑनलाइन – कोरोनाचा वाढत प्रसार रोखण्यासाठी राज्यात ‘माझे कुटूंब, माझी जबाबदारी’ ही मोहीम राबवण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली. या मोहिमेअंतर्गत आरोग्य विभागाचे स्वयंसेवक राज्यातील २ कोटी २५ लाख कुटूंबीयांपर्यंत घरोघरी जाऊन ताप आणि प्राणवायू (ऑक्सिजन) तपासणार आहे. आता यावरुन भाजप नेते नितेश राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे.
नितेश राणे यांनी ट्विटरवर ट्विट करत म्हणाले की, “माझे कुटूंब, माझी जबाबदारी” या मोहिमेला मुख्यमंत्र्यांनी योग्य नाव दिले आहे. कारण. ते स्वतःच कुटूंब सोडून कसलीच जबाबदारी घेत नाहीत !!, लगे रहो !!!” असा टोला लगावत राणेंनी मुख्यमंत्र्यांवर टीका केली आहे.
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी” या मोहिमेला मुख्यमंत्रींनी योग्य नाव दिले आहे..
कारण..
ते स्वतःच कुटुंब सोडून कसलीच जबाबदारी घेत नाहीत!!
लगे रहो !!!— nitesh rane (@NiteshNRane) September 8, 2020
काय आहे योजना ?
या योजनतेमार्फत आरोग्य विभागाने नियुक्त करण्यात आलेले स्वयंसेवक राज्यातील २ कोटी २५ लाख कुटूंबांच्या घरी जाऊन ताप आणि प्राणवायू तपासणार आहे. तसेच नागरिकांना शिक्षण आणि महत्वाचे आरोग्य संदेश, संशयित कोरोना रुग्ण शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा तसेच मधुमेह, मूत्रपिंड विकार, लट्ठपणा, यांसारखे आजार असणाऱ्या व्यक्तींना शोधणे व उपचारासाठी संदर्भ सेवा या बाबींचा समावेश आहे. ही मोहीम पहिल्या टप्प्यात १५ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर, तर दुसऱ्या टप्प्यात १२ ऑक्टोबर ते २४ ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली.