मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात राज्यात महाविकासआघाडीचे सरकार स्थापन झाले आहे. शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांसोबत तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोनच नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. दरम्यान, राष्ट्रवादी आणि काँग्रेसमध्ये उपमुख्यमंत्री रस्सीखेच सुरु होता. यात्रा काँग्रेसला विधानसभा अध्यक्षपद मिळाले असल्याने तो पेच दूर झाला. मात्र, इथेच राष्ट्रवादीने डाव साधला असून यामुळे काँग्रेसची चांगलीच फजिती झाल्याचे बोलले जात आहे.
काँग्रेस उपमुख्यमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपदावर असून बसली होती. मात्र, यातील कोणतेही एकच पद मिळेल असा दबाव राष्ट्वादीकडून टाकण्यात आला. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपद काँग्रेसला देण्यात आले आहे. काँग्रेसकडून शेतकरी नेते नाना पटोले यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली. याचा फायदा राष्ट्रवादीला झाला असून राष्ट्रवादीच्या पारड्यात आता उपमुख्यमंत्रीपद पडणार आहे.
उपमुख्यमंत्रीपदाचे महत्त्व राष्ट्रवादीला चांगलेच ठावूक होते. कारण, सरकारी जाहिरातीत मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचा फोटो पेपरवर दिसतो. त्यात विधानसभा अध्यक्षांना स्थान नसते. आता राष्ट्रवादीकडे हे पद गेल्याने शिवसेनेचा मुख्यमंत्री यांच्यासोबत उपमुख्यमंत्र्यांचा फोटो दिसणार आहे. यामुळे सरकार केवळ शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसचेच आहे का, असा संभ्रम निर्माण झाला असून याविषयी एक काँग्रेस नेत्याने नाराजी देखील दर्शविली होती.