नवी दिल्ली : वृत्तसंथा – महाराष्ट्रात राजकीय भूकंपाचे पडसाद देशभरात उमटू लागले आहे. शिवसेनेने २५ वर्षे जुनी युती तोंडात काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केले. त्यानंतर आता बिहारमध्ये देखील भाजप अडचणीत येणार अशी चर्चा सुरू आहे. राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष रघुवंश प्रसाद सिंह यांनी जेडीयू सोबत सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. ते म्हणाले कि, महाराष्ट्रातील राजकारणाचा साईड इफेक्ट बिहारच्या राजकारणावर होऊ शकतो. कारण म्हणजे जेडीयू आणि आरजेडी यांच्यात सत्तास्थापनेबाबत चर्चा सुरू झाली आहे. जेडीयूला आमच्यासोबत येण्यास काही अडचण नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
याआधीदेखील रधुवंश सिंह यांनी असाच दावा केला होता. भारतीय जनता पक्ष नितीश कुमार यांचं अस्तित्व संपविण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे राजद सोबत जाण्यास नितीश यांची हरकत नाल्याचं त्यांनी नमूद केले होत.
दरम्यान, २०१५ मध्ये नितीश कुमार यांनी लालू प्रसाद यादव यांच्यासोबत निवडणूक लढवली होती. त्यावेळी राजद-जदयूने सत्ता देखील स्थापन केली होती. मात्र नितीश कुमार यांनी २०१७ मध्ये भाजपसोबत जात सरकार स्थापन केले. त्यांनतर आता महाराष्ट्रातील घडामोडींचे चित्र बिहारमध्ये देखील निर्माण होत असल्याची चर्चा सुरु आहे. २०२०मध्ये बिहारमध्ये निवडणूक होणार त्यामुळे जदयू-राजद सोबत येऊ शकेल, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु आहे.