मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘सिंचन घोटाळ्याची फाईल पुन्हा ओपन करा, ‘अशी मागणी प्रहारचे आमदार बच्चू कडू यांनी केली आहे. बच्चू कडू म्हणाले कि, ‘मधल्या काळात सिंचन घोटाळ्याच्या फाईल बंद झाल्या. सिंचनाची अवस्था विदर्भ मराठवाड्यात खराब आहे. मराठवाडा विदर्भात सिंचनाचा अनुशेष कमी झालेला नाही. माझ्या मतदारसंघात आणि अमरावती जिल्ह्यात किमान आठ ते नऊ प्रकल्पाची सुप्रमा भेटलेली नाही, त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हायला पाहिजे. असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे. तसेच ‘पुढचे सहा महिने मंत्री, आमदार, आणि वर्ग एकच्या अधिकाऱ्यांना पगार देऊ नका. ती मदत शेतकऱ्यांना द्या अशीही मागणी करत काल देवेंद्र फडणवीस यांनी नैतिकता गमावल्याचेही बच्चू कडू यांनी केला आहे.
तसेच विधानसभा अध्यक्षांची कालच निवड व्हायला हवी होती. भाजप आणि शिवसेनेची मैत्री गेली २५ वर्षांची आहे.त्यामुळे निदान मैत्रीची नैतिकता म्हणून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करायला हवं होतं. भाजप शिवसेनेची युती पुन्हा होऊ शकते. मात्र कालचा क्षण पुन्हा येणार नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन न करून भाजपने नैतिकता गमावली आहे, असे बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपदी नाना पटोले यांची निवड झाल्याने आमदार बच्चू कडू यांनी पटोले यांचं अभिनंदन केलं. ते म्हणाले, ‘शेतकऱ्याचा मुलगा विधानसभा अध्यक्ष झाला, ही आनंदाची गोष्ट आहे. त्यामुळे मी त्यांचं अभिनंद करतो. ‘ सोबतच बच्चू कडू यांनी सभागृहात बोलताना अपक्ष आमदारांना बोलण्यासाठी कमी वेळ मिळत असल्याचा मुद्दा मांडला. प्रमुख पक्षांच्या सदस्यांना जास्त वेळ दिला जातो आणि ज्यावेळी आमच्याकडे वेळ येते त्याचवेळी कमी का होतो? गेले 15 वर्ष माझ्यासोबत होत आहे, असा सवाल त्यांनी अध्यक्षांना केला.