बहुजननामा ऑनलाइन – जगामध्ये कोरोनाचे संकट हे झपाट्याने वाढत आहे. (covid19 recoveries)भारताला सुद्धा कोरोना संकटाने चांगलेच ग्रासले आहे.भारतात रोज 80 हजारापेक्षा जास्त कोरोनाचे पेशंट वाढत आहेत. पण अशातच मात्र एक दिलासादायक (covid19 recoveries)बातमी समोर आली आहे. ती म्हणजे भारताचे कोरोना पेशंट बरे होण्याचे प्रमाण हे जगात एक नंबर वर आहे.
अशी माहिती शुक्रवारी देशाच्या आरोग्य मंत्रालयाने दिली. आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे की, देशात आता दररोज 80 हजारांहून अधिक कोरोनाची प्रकरणे आढळून येत आहेत, परंतु याचदरम्यान भारताला काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जगातील सर्व देशांमध्ये कोरोनामधून बरे होण्याचा प्रमाणात भारत सध्या आघाडीवर आहे. सोबतच ते म्हणाले की देशात कोरोनाच्या ऍक्टिव्ह संख्याही वेगाने कमी होत आहेत. आरोग्य मंत्रालयानुसार गेल्या दहा दिवसांपासून देशात कोरोनाच्या ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 10 लाखांच्या खाली राहिली आहे, जी सकारात्मक आहे.
ताज्या आकडेवारीनुसार आतापर्यंत देशातील एकूण 53 लाख 52 हजार लोक कोरोनापासून बरे झाले आहेत. आणि ऍक्टिव्ह केस ह्या 9 लाख 42 हजार एवढ्या आहेत. तर गेल्या 24 तासांत देशात 78,877 लोक बरे झाले आहेत. देशातील कोरोनाचा रिकव्हरी रेट 83.70 टक्के आहे तर ऍक्टिव्ह रेट 14.74 टक्के आहे. तसेच भारतातील मृत्यूचे प्रमाण 1.56 टक्के आहे. ही सर्व आकडेवारी पाहून देशाला कुठेतरी धीर मिळाला आहे असे म्हणता येईल.