बहुजननामा ऑनलाईन – भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) ही गुंतवणूतदारांसाठी देशातील विश्वासार्ह कंपनी आहे. एलआयसी(LIC) मध्ये कोट्यावधी लोकांनी गुंतवणूक केली आहे, कारण सरकारद्वारे संचालित झाल्यामुळे येथे तुमची गुंतवणूक पुर्णपणे सुरक्षित आहे. त्याचबरोबर एलआयसीमध्ये गुंतवणूक करणे ग्राहकांसाठी भविष्यात फायदेशीर आहे. आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आनंद पॉलिसीबद्दल. जेथे तुम्ही दररोज 80 रुपये गुंतवणूक करुन दरमहा 28 रुपयाची पेन्शन मिळवू शकता.
कोण करु शकते गुंतवणूक
एलआयसी जीवन आनंद पॉलिसीमध्ये किमान 28 वर्षाचा व्यक्ती गुंतवणूक करु शकतो. ही योजना 25 वर्षांच्या टर्मअंतर्गत रिर्टन ऑफर देते. अधिक बोनस सुविधा, तरलता आणि शुद्ध गुंतवणूकीसाठी हे एलआयसीचे सर्वोत्तम धोरण मानले जाते. किमान विमा रक्कम 1 लाख रुपये आहे आणि कमाल मर्यादा निश्चित केलेली नाही. या पॉलिसीमध्ये रिस्क कव्हर देखील देण्यात आले आहे. पॉलिसीच्या मॅच्युरिटीवर सम ॲश्युअर्डसह इतर फायदे दिले जातात. हे एन्डोमेंट पॉलिसी आहे म्हणून पॉलिसीधारकाला गुंतवणूक आणि विमा या दोन्हीचा फायदा मिळतो.
कशी मिळेल 28 रुपयाची पेन्शन
आता प्रश्न असा आहे की, या पॉलिसीमध्ये दररोज 80 रुपये गुंतवणूक करुन तुम्ही दरमहा 28 रुपये पेन्शन कशी मिळवू शकता. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीने वयाच्या 25 व्या वर्षी 35 वर्षांच्या टर्म प्लॅनमध्ये गुंतवणूक केली असेल तर त्याला प्रथम वर्षाचा प्रीमियम 4.5 टक्के कर भरावा लागेल, जो दरवर्षी 29,555 इतका होतो. म्हणजे ग्राहकांना दररोज 80 रुपये भरावे लागतात.
पहिल्या वर्षाच्या प्रीमियमनंतर ते 2.25 टक्के टॅक्ससोबत 79 रुपये होईल. गणनानुसार, आपल्याला 5015000 रुपये मिळतील. याशिवाय तुम्हाला वयाच्या 61 व्या वर्षापासून पेन्शन मिळेल, जे प्रतिवर्षी 348023 रुपये होते. यानुसार तुम्हाला दरमहा 27664 रुपये मिळतील.