बंगळुरू: बहुजननामा ऑनलाईन – लोकसभेच्या प्रच्यारादरनाम्यान मोदींच्या वक्त्यव्यांनी पंतप्रधानपदाची पातळी खालावली आहे.सर्जिकल स्ट्राईक, एअर स्ट्राईक मधून मोदीनी बाहेर पडून आता त्यांनी देशातील बेरोजगारी आणि गरिबीकडेही लक्ष द्यायला हवे.असे मत कॉंग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी व्यक्त केले.
निवडणुकीच्या प्रचारादरम्यान त्यांची वक्त्याव्य पाहता मोदींपूर्वी कोणत्याही पंतप्रधानाने अशी भूमिका घेतली नव्हती. भाजप सरकार बुलेट ट्रेनवर खर्च करण्यास तयार आहे. परंतु देशातील ७० टक्के गरिबांसाठी पैसे खर्च करायला तयार नाही. असे सिब्बल म्हणाले. भ्रष्टाचार रोखण्याबाबत मोदी यांनी केलेल्या आश्वासनांबाबतही सिब्बल यांनी त्यांची खिल्ली उडवली.
कपिल सिब्बल ‘ऑपरेशन लोटसचा’ उल्लेख करून ते म्हणाले. देशाला लुटून व लुबाडून नीरव मोदी. मेहुल चोक्सी. यांनी देशाबाहेर पळ काढला.असा चौकीदार आपल्याला खरेच हवा आहे का ? असे सिब्बल यांनी चौकीदाराची खिल्ली उडवली.