मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – अलीकडेच काँग्रेसवाशी झालेली अभिनेत्री आणि काँग्रेसची उत्तर मुंबईमधील लोकसभेची उमेदवार उर्मिला मातोंडकर यांच्या विरोधात हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोपावरून भाजप नेते सुरेश नखुआ यांनी पवई पोलिसात तक्रार दाखल केली आहे. परंतु उर्मिला मातोंडकरणी सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
एका टीव्ही शोमध्ये बोलत असताना उर्मिलाने ‘हिंदू धर्म हा जगातील सर्वात हिंसक धर्म’ आहे असे वक्त्यव्य केल्याचा आरोप सुरेश नखुआ यांनी केला आहे. उर्मिलाच्या ह्या वक्त्यव्याने हिंदू धर्मियांच्या भावना दुखावल्याचा आरोप करूत सुरेश नखुआ यांनी पवई पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.या तक्रारीत काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी आणि एका पत्रकाराचंही नाव आहे.
सिनेसृष्टीतील पडद्यावरील कारकिर्द पासून फारकत घेत उर्मिलाने राजकारणात प्रवेश केला आहे. पदार्पणात काँग्रेसने उर्मिलावर विश्वास दाखवत उत्तर मुंबईतून लोकसभेची उमेदवारी जाहीर केली. भाजपचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्याविरोधात उर्मिला निवडणुकीच्या रिंगणात उतरली आहे.
विशेष म्हणजे उर्मिला निवडणूक लढवत असलेल्या उत्तर मुंबईतून काँग्रेसचा २००४ मध्ये सेने अभिनेते गोविंदा यांनी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यावेळी गोविंदा यांनी भाजपचे नेते राम नाईक यांचा पराभव करत संसदेत प्रवेश केला होता. यावेळी उर्मिला २००४ ची पुनरावृत्ती करील का ? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.