बरेली : वृत्तसंस्था- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या वक्तव्यावर इत्तेहादे मिल्लत कौन्सिल (आयएमसी) चे प्रमुख मौलाना तौकीर रजा खां यांनी म्हटले आहे की, देशाच्या प्रत्येक नागरिकाला हिंदू म्हणणे चुकीचे आहे. सर्व नागरिकांना हिंदुस्तानी म्हटले जाऊ शकते, पण हिंदू नाही. देशात प्रत्येक धर्माची आपली वेगळी ओळख आहे. संघ प्रमुख भागवत यांनी रविवारी बरेली येथे म्हटले होते की, हिंदूंकडे त्यांच्या पूजा पद्धतीनुसार बघू नका, कारण जे हिंदुस्तानमध्ये राहतात ते हिंदू आहेत.
यावर मौलाना तौकीर यांनी नाराजी आणि असहमती दर्शवत प्रतिक्रिया दिली आहे. मंगळवारी आपल्या निवास्थानी पत्रकारांशी बोलातना ते म्हणाले की, भारतात हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाइ, जैन ईत्यादी तमाम धर्मांना मानणारे लोक राहतात. सर्वजण आपल्या धर्मानुसार जीवन जगत आहेत, यामुळे हिंदू मुसलमान होऊ शकत नाहीत आणि मुसलमान हिूंद होऊ शकत नाहीत. लोकसंख्येच्या प्रश्नावर ते म्हणाले, लोकसंख्या नियंत्रणासाठी इस्लाममध्ये नसबंदी अमान्य आहे. पण अन्य उपाययोजना केली जाऊ शकते.
25-25 मुले जन्माला घालतात असे मुस्लिमांच्याबाबती बोलणे चुकीचे आहे. काँग्रेस सरकारच्या काळातील नसबंदीचा उल्लेख करून ते म्हणाले तेव्हा मुफ्ती आजम हिंद यांनी नसबंदीविरूद्ध फतवा काढला होता. एका प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले देशाचे तुकडे होणे आम्हाला अमान्य आहे. देशाचे तुकडे तर हिंदुस्तानी राज्यकर्त्यांनी केले.
Visit : bahujannama.com