नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताकडून पाकिस्तानकडे जाणाऱ्या नद्यांचे पाणी थांबविण्याच्या योजनेचे काम आता अंतिम टप्प्यात पोहोचले असून पाकिस्तानला दिले जाणारे पाणी बंद करण्याची तयारी भारताकडून केली जात आहे. केंद्रीय जल ऊर्जा मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी रावी नदीवर बांधल्या जाणाऱ्या बंधाऱ्याचा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानला जाणार नाही आणि ते पाणी भारतामध्ये वापरले जाणार असल्याचे सांगितले.
केंद्रीय मंत्र्यांनी रावी नदीवर बांधल्या जाणाऱ्या बैराज प्रकल्पाला बुधवारी भेट दिली. त्यावेळी शेखावत बोलत होते. ते म्हणाले की, बैराज प्रकल्प तयार झाल्यामुळे पंजाब, हरियाणा आणि राजस्थानमधील शेतकऱ्यांना पाण्याचा सर्व वाटा मिळेल. तसेच त्यांनी रंजित सागर धरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन घटनास्थळाची पाहणी केल्यावर बैराजचे काम प्रगतीपथावर असून २०२२ पर्यंत हे काम पूर्ण होण्याची आशा व्यक्त करत बॅरेज बांधण्यासाठी केंद्र सरकारकडून निधीची कमतरता भासणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
तसेच पुढे त्यांनी म्हटले की, धरणातून सुटलेले पाणी सीमावर्ती भागात दिले तर १०० पेक्षा जास्त गावांना पिण्याचे पाणी उपलब्ध होईल. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार ८६ टक्के निधी देईल, असे ते म्हणाले. जम्मू-काश्मीरला फायदा होण्यासाठी जमू-काश्मीरच्या वाट्यासाठी केंद्र सरकारही निधी पुरवून पंजाब सरकार बॅरेजच्या १४ टक्के खर्च देईल.
Visit : bahujannama.com