मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – ‘मी परत येईन म्हटलं पण कुठं बसेन ते सांगितलं नाही, अशी खोचक टोला जयंत पाटील यांनी माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लगावला आहे. आज विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी विधानसभा अध्यक्ष म्ह्णून काँग्रेस नेते नाना पाटोळे तर विरोधी पक्षनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी फडणवीसांचे अभिनंदन करताना जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना चिमटे काढले.
जयंत पाटील पुढे म्हणाले कि, ‘फडणवीस यांची विरोधी पक्षनेते म्हणून निवड योग्य आहे. देवेंद्र फडणवीस हे अभ्यासू नेते असून गेली ५ वर्ष फडणवीसांनी चांगले काम केले आहे. प्रसिद्धीप्रमुख म्हणूनही देवेंद्र फडणवीसांनी यापूर्वी काम केलं होतं. त्याचा फायदा त्यांना मुख्यमंत्री म्हणून सरकार चालविताना झाला. आमच्या काळात आम्ही प्रसिद्धीसाठी निधी ठेवला पण आमच्या बाबांनी सांगितले इतका पैसा प्रसिद्धीवर खर्च करायचा नाही, अश्या शब्दात पाटील यांनी फडणवीसांना चिमटा काढला.
तसेच, तसेच पुढील ५ वर्ष तुम्ही त्याठिकाणीच बसावं, या बाकांवर येण्याचा प्रयत्न करु नये, २०२४ मध्ये लोकशाही मार्गाने प्रयत्न करायला हवेत, तुमचे सगळ्यांशी जवळचे संबंध आहे. प्रत्येकाला दिलेल्या खुर्च्या फिक्स असून खुर्च्या बदलण्याचे प्रयत्न कोणी केले तर आपल्याकडून त्याला प्रतिसाद मिळणार नाही असं काम करा. विरोधी पक्षनेत्याच्या खुर्चीचा मान वाढविण्याचा प्रयत्न तुमच्याकडून व्हावा. महाराष्ट्रातील जनतेला न्याय देण्याचा काम कराल अशी शुभेच्छा देतो असं सांगत अप्रत्यक्षरित्या घोडेबाजारावरुन जंयत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांना चांगलेच सुनावले आहे.