नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात रांची येथे पार पडलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात भारताने 1 डाव आणि 202 धावांनी विजय मिळवत दक्षिण आफ्रिकेचा धुव्वा उडवला. कालच्या 8 बाद 132 धावसंख्येवरून पुढे खेळताना आफ्रिकेचे फलंदाज केवळ 12 चेंडूंचा सामना करू शकले. या विजयासह भारतीय संघाने आफ्रिकेचा 3-0 असा धुव्वा उडवत मालिका विजय साजरा केला. तिसरा सामना जिंकून आफ्रिकेला व्हाइट वॉश दिला.
पहिल्या डावात भारतीय संघाने केलेल्या 9 बाद 497 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांनी भारतीय गोलंदाजांसमोर अक्षरशः नांगी टाकली. पहिल्या डावात आफ्रिकेला केवळ 162 धावा करता आल्या. त्यानंतर भारतीय संघाने फॉलोऑन लादल्यानंतर देखील दुसऱ्या डावात त्यांची दाणादाण उडाली. भारताच्या वतीने शमीने 10 धावात 3 तर उमेश यादवने 2 गडी बाद केले. दुसऱ्या डावात आफ्रिकेला केवळ 133 धावाच करता आल्या. तत्पूर्वी पहिल्या डावात भारताच्या रोहित शर्मा याने शानदार द्विशतक झळकावत नवीन विक्रम केला आहे. तर अजिंक्य रहाणे याने शतक झळकावत मोलाचे योगदान दिले.त्यांच्या या कामगिरीच्या बळावर भारताने पहिला डाव हा 9 बाद 497 धावांवर घोषित केला. त्यानंतर मैदानावर उतरलेल्या आफ्रिकेला पहिल्या डावात केवळ 162 धावाच करता आल्या.
दरम्यान, भारतीय संघाने या मालिका विजयासह घरच्या मैदानावर सलग 11 मालिका जिंकण्याचा विक्रम केला असून त्यांनी ऑस्ट्रेलियाचा दहा मालिका विजयाचा रेकॉर्ड मोडला आहे.
Visit : bahujannama.com
- ‘हे’ सेवन केलंत तर डोकं चालेल जबरदस्त ! जाणून घ्या काय आहे यामध्ये –
- डोळ्यांची ‘ही’ लक्षणे ओळखली तर ‘या’ आजारांवर वेळीच करू शकता उपचार –
- डोळे आल्यास अशी घ्या काळजी, संसर्गापासून वाचण्यासाठी असे करा उपाय –
- आकर्षक फिगरसाठी करा ‘हे’ ५ घरगुती उपाय, वजन होईल कमी –
- चांगल्या आरोग्यासाठी शरीराला दररोज किती कॅलरीजची असते आवश्यकता –
- स्मार्टफोनचा अतीवापर केलात तर लवकर होऊ शकता म्हातारे, जाणून घ्या –
- गर्भनिरोधक गोळ्यांचा वापर करा योग्य प्रमाणात, होऊ शकतो ‘हा’ गंभीर आजार –
- पिळदार शरीरासाठी ‘हे’ आवश्य खा, असा करा या पदार्थाचा वापर –