मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – काल २१ ऑक्टोबरला महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत २८८ जागांसाठी मतदान करण्यात आलं. सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या मतदानानंतर विविध संस्थांनी एक्झिट पोलद्वारे आपला अंदाज व्यक्त केला. या एक्झिस्ट पोल मधून भाजप – शिवसेना महायुतीला बहुमत मिळण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे एक्झिट पोलमधून सुद्धा काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला मोठा धक्का बसणार असल्याची शक्यता आहे. मात्र दुसरीकडे हे अंदाज जर योग्य ठरले तर या एक्झिट पोलच्या आकड्यांचा फटका शिवसेनेलाही बसू शकतो, असे म्हंटले आहे.
२०१४च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भाजपला १२२ जागा मिळाल्या होत्या. परंतु १४५ आकडा गाठत सत्ता स्थापन करण्यासाठी भाजपला शिवसेनेचीही मदत घ्यावी लागली. त्यानंतर भाजप-शिवसेनेचं सरकार स्थापन झालं. मात्र यंदाच्या विधानसभा निवडणुकीनंतर आलेल्या एक्झिट पोलमध्ये भाजपला १४१ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला असून शिवसेनेला १०२ जागा मिळणार असल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे जर हे अंदाज खरे ठरले तर भाजपला स्वबळावर सत्ता स्थापन करण्यासाठी फक्त ४ आमदारांची गरज भासणार आहे. त्यामुळे भाजप अपक्षांची मदत घेऊन आपली सत्ता स्थापन करू शकते. ज्यामुळे शिवसेना सत्तेपासून दूर राहू शकते.
दरम्यान २८८ जागांसाठी असलेल्या महाराष्ट्र विधानसभेत बहुमत मिळवत सत्ता स्थापन करण्यासाठी १४५ जागांचा आकडा गाठावा लागतो. त्यात आता एक्झिस्ट पोल मध्ये महायुतीला २४३ जागा, काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीला ४१ जागा मिळणार असल्याच शक्यता वर्तविली जात आहे,
२०१४ विधानसभा निवडणूक विजयी आकडेवारी – २०१९ विधानसभा एक्झिस्ट पोल :
भाजप = १२१ – १४१
सेना = ६३ – १०२,
काँग्रेस = ४२- १७,
राष्ट्रवादी =४१ – २२,
दरम्यान यंदाच्या एक्झिस्ट पोलनुसार इतर पक्ष :
एमआयएम -१
मनसे – १
इतर – २
अपक्ष – ३
Visit : bahujannama.com