बहुजननामा ऑनलाईन टीम – गुरुवारी उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राचे २९ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. मी उद्धव बाळासाहेब ठाकरे, ईश्वर शपथ घेतो की……असे म्हणत ठाकरेंनी शपथविधी पार पाडली. त्यानंतर गगनभेदी घोषणांमध्ये शिवसैनिकांचा आवाज घुमला. हा शपथविधी समारंभ अनेकांनी याचि देही याचि डोळा पाहिला. परंतू या शपथविधी सोहळ्यादरम्यान भगतसिंह कोश्यारी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. शपथ घेण्यापुर्वी उद्धव ठाकरेंनी काही नेत्यांची नावे घेतली होती. राज्यापालांच्या मते हे शपथ ग्रहण समारंभाच्या प्रोटोकॉलच्या विरुद्ध आहे.
उद्धव ठाकरेंच्या शपथ ग्रहण समारंभादरम्यान मंचावर योग्य व्यवस्था नव्हती. या समारंभादरम्यान प्रशासनाला मंचावरची व्यवस्था करु दिली नाही त्यामुळे ही त्यामध्ये बऱ्याच त्रुटी होत्या. शपथविधीदरम्यान नेत्यांनी नावे घेतल्यामुळे राज्यपाल नाराज असल्याचे दिसत आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लाखोंच्या साक्षीने गुरुवारी महाराष्ट्राचे २९ मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. शपथ घेतल्यानंतर उपस्थित सर्व जनसागराला साष्टांग दंडवत घातल उद्धव ठाकरे यांनी कृतज्ञता व्यक्त केली. जेव्हा उद्धव ठाकरे नतमस्तक झाले तेव्हा लाखो लोक विनम्रभावाने हेलावून गेले. महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी अत्यंत मोलाची भूमिका बजावणारे दिग्गज नेते आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना ते कृतज्ञतापूर्वक भेटले तेव्हा लाखो लोकांनी टाळ्यांचा गडगडाट केला. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत एकनाथ शिंदे, सुभाष देसाई, बाळासाहेब थोरात, नितीन राऊत, जयंत पाटील, छगन भुजबळ आदींना राज्यपालांनी पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
Visit : bahujannama.com