नवी दिल्ली : वृत्तसंस्था – दुबळ्यांना समान संधी, सन्मान देऊन समतेचा वस्तुपाठ घालून देणारे, उद्योजकतेला प्रोत्साहन देणारे, जलसंधारणाचे महत्त्व पटवून देणारे, सत्यशोधकी विचारांना बळ देणारे, आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांची जयंती महाराष्ट्र तसेच देशभरात साजरी केली जाते. जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील नेत्यांनी संसद परिसरातील पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
याप्रसंगी माजी केंद्रीय कृषिमंत्री आणि राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, कुमार केतकर, केंद्रीय मंत्री गिरीश बापट, रावसाहेब दानवे, श्रीरंग बारणे, रिपाइंचे सर्वेसर्वा रामदास आठवले आदी उपस्थित होते.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त संसद परिसरातील त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.
Paid My Respects to Rajarshi Shahu Maharaj on his Birth Anniversary today in the Parliament Premises. pic.twitter.com/pRWcisJxnp
— Supriya Sule (@supriya_sule) June 26, 2019
शाहू महाराजांविषयी काय म्हणाले होते आंबेडकर
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी म्हंटले होते की शाहू महाराजांची जयंती सण उत्सवाप्रमाणे साजरी करा.