नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशातील लोकसभा निवडणुकीच्या सात टप्प्यापैकी चौथ्या टप्प्यातील मतदान २९ एप्रिल रोजी पार पाडले चौथ्या टप्प्यातील मतदान सुरू असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा करून खळबळ उडवली. ममतादीदी, लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर तुमचे आमदारही तुम्हाला सोडून जातील. सध्या तुमचे ४० आमदार माझ्या संपर्कात आहेत, पण भाजपा फक्त निवडणूक जिंकण्याची वाट बघत आहे तुमचे सर्व आमदार तुम्हाला सोडून भाजपात प्रवेश करतील .असा टोला मोदींनी लगावला होता.
The letter written yesterday further reads,"You are thus requested to ask PM Narendra Modi for evidence in support of his statement,failing which his nomination should be cancelled for violation of the Model Code of Conduct by making such provocative and undemocratic statements." https://t.co/yc3An9uLN6
— ANI (@ANI) April 30, 2019
मोदींनी केलेल्या विधानावरून तृणमूल काँग्रेस चांगलीच आक्रमक झाली आहे. तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पत्र पाठवले आहे. या पत्रात म्हटले आहे की, मोदींनी तृणमूलचे ४० आमदार संपर्कात असल्याचा खोटा दावा केला आहे हे सरळसरळ आचारसंहितेचे उल्लंघन आहे त्यामुळे आयोगाने मोदींची उमेदवारी रद्द करावी .अशा प्रकारचे खोटे दावे करुन मोदी हे मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत आहेत या प्रकरणाची निवडणूक आयोगाने दखल घ्यावी. अशी मागणीही तृणमूल काँग्रेसने निवडणूक आयोगाला पाठवलेल्या पत्रात केली आहे.