जळगाव : बहुजनामा ऑनलाइन – डॉ.बाबासाहेब आंबेेडकरांची चळवळ ही मानवाला सर्वांगाने मुक्त करण्याची चळवळ होती. ब्रिटीशांचे पारतंत्र हे केवळ १५० वर्षांचे होते. मात्र या देशात अस्पृश्यांचे पारतंत्र्य हे १५०० वर्षांपूर्वीचे होते . ते तोडण्याचे काम डॉ.आंबेडकरांनी केले, असे प्रतिपादन प्रा.आनंद देवळेकर यांनी केले. येथील सम्यक प्रबोधन मंच यांचे विद्यमाने माता रमाई यांच्या १२१ व्या जयंती निमित्ताने खान्देश धम्म क्रांती साहित्य परिषदेचे आयोजन जिल्हाधिकारी कार्यालयातील अल्पबचत भवनात करण्यात आले होते. त्याप्रसंगी प्रा.आनंद देवळेकर बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवी वसंतराव सपकाळे होते. तसेच मंचावर साराभाई वेळुंजकर, प्रा.नानासाहेब पटाईत, सुरेश साबळे, अरविंद सुरवाडे, धर्मराज निमसरकर, रमेश सरकाटे, प्रा. यशवंतराव मोरे, पोलीस उपाधीक्षक दिलीप पगारे, मुकुंद नन्नवरे, व्ही. डी. बिरारे, ॲड. राजेश झाल्टे आदी मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्याहस्ते माता रमाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. आंबेडकरी गीत ॲड.रागिणी बोदडे यांनी म्हटले. या प्रसंगी प्रा.ज्योत्स्ना मोरे, इंजि.ममता सपकाळे,पंचशिला सपकाळे यांनी माता रमाईंच्या जीवनावर प्रकाश टाकला. त्यानंतर ‘डॉ.आंबेडकर यांची धम्मक्रांती फलश्रुती आणि आव्हाने’ या विषयावर परिसंवाद घेण्यात आला. अध्यक्षस्थानी अरविंद सुरवाडे होते. यावेळी किरण सोनवणे, सिद्धार्थ मोरे, मुकुंद पगारे यांनी आपले विचार मांडले.
तिसऱ्या सत्रात पुणे येथील कवी धर्मराज निमसरकर यांचे अध्यक्षतेखाली कवी संमेलन झाले. यात भीमराव सोनवणे, एस.व्ही.झाल्टे, रमेश सरकटे, दिलीप इंगळे, गोविंद देवरे, भगवान भटकर, प्रकाश बारी, एस. पी. झाल्टे, किशोर नेवे, विजया सपकाळे, पुष्पा सपकाळे, उमाकांत वानी आदिंनी कविता सादर केल्या. यशस्वीतेसाठी जयंत मगर,सुनील दाभाडे,अशोक सपकाळे, अनिल अडकमोल, रवींद्र वानखेडे, भीमराव सपकाळे, मुरलीधर सपकाळे, अतुल सोनवणे, विलास सोनवणे, उत्तम भालेराव, दिलीप सपकाळे, राजेंद्र गडवे, सुहास बागुल,राजन भालेराव, जे. डी. भालेराव, संतोष गायकवाड, भरत जाधव आदिंनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रा. यशवंतराव मोरे यांनी तर आभार बळवंतराव भालेराव यांनी मानले.