मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – शिवसेनेचे उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री पद मिळाल्यानंतर मुख्यमंत्री राहिलेल्या देवेंद्र फडणावीस यांना वर्षा बंगला सोडावा लागला आहे. त्यातच त्यांनी वर्षा बंगला सोडण्यास उशीर केला आहे. परंतु बंगल्याच्या भिंतीवर उद्धव ठाकरे यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर आढळून आल्याने याला फडणवीस यांनी डर्टी पॉलिटिक्स म्हटले आहे.
या प्रकरणाबद्दल एका वृत्तसंस्थेशी बोलताना आपण बंगला सोडताना तिथे कोणतेही लिखाण केलेले नव्हते, असे सांगितले आहे. मुख्यमंत्र्यांबद्दलचा हा मजकूर सगळीकडे व्हायरल होत आहे. हा बंगला त्यांना राहण्यासाठी तयार करण्यात येत असताना हा मजकूर लिहिला गेला असल्याची माहिती समोर येत आहे. भिंतीवरील मजकुरात युतीबद्दल आक्षेपार्ह लिखाण केले आहे.
या मजकूराबद्दल आता चर्चा सुरू झाली आहे. फडणवीस यांनी म्हटल्याप्रमाणे बंगल्यातील प्रत्येक कोपरा तपासला होता. तिथे कर्मचारी काम करत असून त्यांची मुलेही बंगल्यात खेळत असत. मजकूर कोणी लिहिला याबद्दल मला काहीच माहिती नाही. तसेच हे खूप खालच्या दर्जाचे राजकारण असून हे सर्व बदनामीसाठी केले जात असल्याचेही फडणवीसांनी म्हटले आहे. या प्रकरणाबाबत चौकशी करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन राऊत यांनी सांगितले.
Visit : bahujannama.com