सिंधुदुर्ग : बहुजननामा ऑनलाईन – सावंतवाडी नगराध्यक्ष पोटनिवडणुकीमुळे कोकणातील राजकारण तापले असून आता शिवसेनेचे दीपक केसरकर यांनी नारायण राणेंवर अतिशय गंभीर आरोप केला आहे. ‘नारायण राणे यांच्याकडील पैशाला रक्ताचा वास आहे,’ असा आरोप केसरकर यांनी केला आहे. त्यानंतर ‘मर्द होतास तर तपास का नाही केला ?’ असा प्रश्न राणेंनी केसरकर यांना केला आहे.
‘माझ्यावर खुनाचा आरोप करत असताना केसरकरांनी पाच वर्ष गृहमंत्री असूनही त्याचा तपास का नाही केला ? त्यांनी सावंतवाडीमध्ये एकही विकास प्रकल्प सुरु केलेला नाही.’ असेही राणे म्हणाले. केसरकरांनी राणेंसह भाजपच्या इतरही नेत्यांवर टीका केली आहे.
त्यांना उत्तर देत भाजपचे जिल्ह्याध्यक्ष प्रमोद जठार यांनी केसरकर हे श्वान परंपरेतले असल्याचे म्हटले आहे. युती तुटल्यावर सावंतवाडीमध्ये पहिल्यांदा निवडणूका होत असून भाजप आणि शिवसेना या दोन पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप चालूच आहेत.
Visit : bahujannama.com