सोलापूर : बहुजननामा ऑनलाईन – सत्तेपासून उपेक्षित वर्गाच्या प्रश्नाचे भांडवल करत मंत्रीपदापर्यंत पोहचलेले महादेव जानकर संपत्तीच्या मोहात पडले आहेत. त्यांच्या सत्तेचा धनगर समाजाला कसलाच फायदा झाला नाही. उलट धनगर आरक्षनाचा प्रश्न प्रलंबित आहेत उलट शून्य टक्के संपत्तीचा दावा करत लोकसभेची उमेदवारी लढवणारे महादेव जानकर हे विधान परिषद निवडणुकीतले कोट्याधीश उमेदवार ठरले. असा आरोप मंत्री महादेव जानकरांसाठी ‘किंगमेकर’ ठरलेले प्रजा सुराज्य पक्षाचे संस्थापक दशरथ राऊत यांनी केला आहे.
महादेव जानकारांनी सत्तेपर्यत पोहचण्यासाठी सामान्याच्या प्रश्नाचे करून सत्तेत गेले. सत्ता प्राप्त झाल्यानंतर मात्र, जानकरांना समाजासह सामान्य माणसाच्या प्रश्नांचा विसर पडला आहे, असा आरोप त्यांचे खंदे समर्थक दशरथ राऊत यांनी केला आहे. त्यांनी जानकरांपासून विभक्त होत प्रजा सुराज्य पक्षाच्या रुपात वेगळा संसार मांडला आहे. गेल्या २५ जानेवारीला राऊत यांनी कोल्हापुरातून प्रजा जागर यात्रा सुरू केली आहे.
प्रजा सुराज्य पक्षाची यात्रा घेऊन राऊत सद्या २० जिल्ह्यांच्या दौऱ्यावर निघाले आहेत. ही यात्रा आज सोलापूरात आल्यावर त्यांनी मंत्री महादेव जानकर यांच्या कामाचा लेखाजोखा मांडला. जानकरांना लक्ष्य करताना दशरथ राऊत यांनी भाजप सरकारला ग्रामीण समाजमनाचा आरसा दाखवला आहे. तर दुसरीकडे राजकीय पक्षांनी घराणेशाहीच्या माध्यमातून सत्ता आपल्या दावणीला बांधल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आगामी निवडणुकीत राज्यातील सर्व जागा लढवून नव्या लढाईची सुरुवात करणार असल्याचे राऊत यांनी म्हटले आहे.
राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून दशरथ आबा राऊत यांनी गेली १७ वर्षे महादेव जानकर यांची साथ दिली आहे. गाव-पाड्यावर राष्ट्रीय समाज पक्षाचा झेंडा पोहचवणाऱया प्रमुख नेत्यांपैकी ते एक आहेत. पण संघर्षाचा काळ संपला अन् जाणकारांना सत्तेची ऊब लागली. त्यामुळे जानकरांची सामान्य माणसांच्या प्रश्नांची नाळ तुटली. असे सांगत त्यांनी त्यांचा पुन्हा नव्याने प्रवास प्रजा सुराज्य पक्षाने सुरू केला आहे.