नवी दिल्ली : वृत्तसंस्था – देशात कोरोना व्हायरसचा वेग मंदावत असल्याचे दिसत आहे. वेगाने खाली येत असलेल्या कोरोनाच्या आलेखाने दिलासा आवश्य दिला आहे, परंतु संकट अजूनही कमी झालेले नाही. आरोग्य मंत्रालयाकडून जारी आकड्यांनुसार मागील 24 तासात कोविड-19 संसर्गाची 31,521 नवी प्रकरणे समोर आली, तर 412 लोकांचा मृत्यू झाला. नवीन केस समोर आल्यानंतर देशात आतापर्यंत कोरोना संक्रमित कोरोना रूग्णांची एकुण संख्या 97 लाख 67 हजार 371 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयानुसार, देशात आतापर्यंत 92 लाख 53 हजार 306 लोक रिकव्हर झाले आहेत, तर सध्या 3 लाख 72 हजार 293 अॅक्टिव्ह केस आहेत. मागील 24 तासात झालेल्या मृत्यूनंतर देशात मृतांची एकुण संख्या वाढून आता 1 लाख 41 हजार 772 झाली आहे. आयसीएमआरनुसार, देशात मागील 24 तासात 9,22,959 कोरोना चाचण्या करण्यात आल्या.
राजधानी दिल्लीत बुधवारी कोरोनाचे 2463 नवे रूग्ण समोर आले, तर आणखी 50 लोकांचा मृत्यू झाला. दिल्लीत नवे रूग्ण सापडल्यानंतर कोरोना संक्रमितांची एकुण संख्या 5 लाख 99 हजार 575 झाली आहे. यापैकी 20 हजार 546 रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर 5 लाख 69 हजार 216 लोक बरे झाले आहेत. संसर्गाने मृत्यू झालेल्या रूग्णांची संख्या आता 9813 झाली आहे.
महाराष्ट्रात कोरोनाच्या 4981 नव्या केस, 75 मृत्यू
महाराष्ट्रात बुधवारी कोरोनाने 4981 लोक संक्रमित झाले, तर 75 लोकांचा मृत्यू झाला. नवीन केस समोर आल्यानंतर राज्यात कोरोना संक्रमित रूग्णांची संख्या 18 लाख 64 हजार 348 झाली आहे. महाराष्ट्रात अजूनही 73 हजार 166 रूग्णांवर उपचार सुरू आहे. तर 17 लाख 42 हजार 191 लोक बरे झाले आहेत. कोरोना संसर्गाने मृत्यू झालेल्यांची एकुण संख्या आता 47 हजार 902 झाली आहे.