दिल्ली : वृत्तसंस्था – कोरोना व्हायरसने आता भारतातही दहशत पसरवली असून आता दिल्लीच्या सरकारनेही कोरोनाला साथीचा आजार म्हणून घोषित केले आहे. तसेच त्यांनी ३१ मार्चपर्यंत दिल्लीतील सर्व शाळा, महाविद्यालये आणि चित्रपटगृहं बंद ठेवायचा निर्णय घेतल्याची माहिती दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली आहे.
Delhi govt has declared Coronavirus an epidemic. We need to exercise abundant caution to contain the disease. All cinema halls, schools, colleges in Delhi will be shut until 31st March, but exams will continue as scheduled. People are advised to stay away from public gatherings. pic.twitter.com/2vHyinNKAP
— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) March 12, 2020
अरविंद केजरीवाल यांनी देशात कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेत दिल्ली सरकारने हा निर्णय घेतल्याचे म्हटले आहे. देशात आतापर्यंत कोरोनाचे ७३ रुग्ण आढळले असून गुरुवारी मध्य प्रदेश, लडाख, महाराष्ट्रात रुग्ण आढळले आहेत. तसेच आयपीएलचीही अडचण वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही देशातील घाबरून जाण्याची गरज नसल्याचे ट्विट केले आहे. तसेच सरकार सतर्क असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.
दिल्ली सरकारच्या या निर्णयामुळे चित्रपट व्यवसायिकांच्या कमाईवर मोठा परिणाम होत असून १३ मार्च रोजी इरफान खानचा ‘अंग्रेजी मीडियम’ आणि २० मार्चला फरार हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. तसेच अक्षय कुमारचा सूर्यवंशी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे. देशात १२ राज्यांत कोरोनाबाधित रुग्ण आढळूले असून त्यात महाराष्ट्रातील ११ जणांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे एकूण ७३ जणांना करोनाची लागण झाल्याचे केंद्र सरकारने जाहीर केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. यात १७ परदेशी रुग्णांचा समावेश असून या रोगाला जागतिक आरोग्य संघटनेने महामारी म्हणून घोषित केले आहे. तसेच आता हरियाणानंतर दिल्ली सरकारनेही कोरोनाला साथीचा रोग म्हणून घोषित केले आहे.