मुंबई : बहुजननामा ऑनलाईन – मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला १२ टक्के नोकरीत, १३ टक्के शिक्षणात आरक्षणाचा निकाल दिला. घटनात्मकदृष्ट्या ५० टक्के आरक्षण देण्याची मर्यादा असली तरी अपवादात्मक परिस्थितीत त्यात बदल करता येऊ शकतो असेही म्हंटले आहे. पण या मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात काही याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयात जाण्याची भाषा केली होती यावर काँग्रेस आमदार नितेश राणे यांनी सर्वोच्च न्यायालयात लढण्यासाठी तयार आहोत असे म्हंटले आहे.
आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून आमदार नितेश राणे यांनी ट्विट करताना म्हंटले आहे कि,उच्च न्यायालयाने दिलेल्या मराठा आरक्षणाच्या निर्णयाविरोधात विरुद्ध कोण सर्वोच्च न्यायालयातव जाण्याची भाषा करत असेल..तर आम्ही तिथे ही लढण्यासाठी तयार आहोत असं नितेश राणे यांनी म्हंटल आहे. आपल्या ट्विटमध्ये त्यांनी म्हंटले आहे कोर्टाने मराठा आरक्षणाबाबत जो ऐतिहासिक निर्णय दिला. या लढ्याचा मी एक भाग होतो. या न्यायालयीन लढाईतही अंतिम निकालात माझं नाव याचिकाकर्ते म्हणून होतं त्याचा मला अभिमान आहे असही त्यांनी सांगितले.
दरम्यान ,मुंबई उच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणासंदर्भात नारायण राणे समिती नेमण्यात आली होती.
कालच्या निकालाच्या विरूध कोण सुप्रीम कोर्टात जायची भाषा करत असेल..तर आम्ही तिथे ही लढण्यासाठी तयार आहोत!
हर हर महादेव!!— nitesh rane (@NiteshNRane) June 28, 2019