औरंगाबाद : बहुजननामा ऑनलाइन – पोलीस भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणी परीक्षेत बदल करण्यात आले आङेत. या भरती प्रक्रियेतील शारीरिक चाचणीवेळी पुल अप्स आणि लांब उडी वगळण्यात येणार आहे. डिसेंबर २०१९ मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीमध्ये हे बदल लागू करण्यात येणार आहेत.
पोलीस भरती प्रक्रियेत हे बदल उमेदवारांच्या हितासाठी बदलण्यात आले आहेत. यापूर्वी झालेल्या पोलीस भरती प्रक्रियेमध्ये पुल अप्स आणि लांब उडीसाठी २० मार्क देण्यात येत होते. यापूर्वी शारीरिक चाचणी परीक्षा महिला आणि पुरुष उमेदवारांसाठी १०० गुणांची होती. ती आता ५० गुणांची करण्यात आली आहे. शारीरिक चाचणी परीक्षा देण्यासाठी लेखी परीक्षेत खुल्या प्रवर्गासाठी किमान ३५ गुण तर मागास प्रवर्गातील उमेदवारांनी ३३ टक्के गुणांनी पास होणे गजरचे आहे.
असे आहेत शारीरिक चाचणी परीक्षेतील बदल
पुरुष उमेदवारांसाठी
गोळा फेक – १० गुण (पूर्वी गोळा फेक – २० गुण)
१०० मीटर धावणे – १० गुण (पूर्वी १०० मीटर धावणे-२० गुण)
१६०० मीटर धावणे – ३० गुण (पूर्वी ५ किमी धावणे २० गुण)
पुलअप्स आणि लांब उडीसाठी पूर्वी या अनुक्रमे २० आणि १० गुण होते.
महिला उमेदवारांसाठी
गोळा फेक – १० गुण (पूर्वी गोळा फेक (४ किलो) – २५ गुण)
१०० मीटर धावणे – १० गुण (पूर्वी १०० मीटर धावणे – २५ गुण)
८०० मीटर धावणे- ३० गुण (पूर्वी ३ किमी धावणे -२५ गुण)
डिसेंबर २०१९ मध्ये होणारी पोलीस भरती नव्या नियमानुसार होणार आहे. या बदलामुळे उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.